शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान बनतेय मद्यपींचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 21:35 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

पालिकेचे भार्इंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे एकमेव भव्य मैदान अस्तित्वात असुन तेथे खेळण्यासाठी स्थानिक तसेच शहराबाहेरील खेळाडू दररोज येत असतात. या मैदानातून काही रणजी तर भारतीय क्रिकेट संघात क्रिकेटपटूंनी प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे येथे क्रिकेट खेळणाऱ्यांसह फुटबॉल खेळणारे व योगा करण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच या मैदानात प्रभातफेरीसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असल्याने शहरातील अनेक नागरीक येथे सकाळी प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यामुळे हे मैदान नेहमी गजबजलेले ठरत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने तीन पाळ्यांत प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक मैदानात नियुक्त केले आहेत. तसेच दिवसा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदार देखील नियुक्त करण्यात आला आहे. मात्र रात्रीच्या वेळी या मैदानात परिसरातील काही मद्यपी मद्यपार्टीसाठी येत असल्याची माहिती अनेकदा मिळत असल्याने त्याकडे तैनात सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप मैदानात प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. त्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आल्या असुन त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. अखेर १४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास मद्यपींनी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या व खाद्यपदार्थ तसेच सोडून तेथुन पोबारा केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभातफेरी करणाय््राांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मैदानात उपस्थित असलेले कंत्राटदाराचे कर्मचारी प्रकाश कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच मैदानात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील समज दिल्याचे त्यांनी सांगितले. 

 

या मैदानात अनेक लहान मुले खेळण्यासाठी तर महिला व ज्येष्ठ नागरीक प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यांच्यासमोर असे प्रकार उघड होऊ लागल्यास ते मैदानात येणार नाहीत. परिणामी मैदानाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत.

-  प्रभातफेरीसाठी येणारे ज्येष्ठ नागरीक अजित पाटील 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर