शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भार्इंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान बनतेय मद्यपींचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 21:35 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

पालिकेचे भार्इंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे एकमेव भव्य मैदान अस्तित्वात असुन तेथे खेळण्यासाठी स्थानिक तसेच शहराबाहेरील खेळाडू दररोज येत असतात. या मैदानातून काही रणजी तर भारतीय क्रिकेट संघात क्रिकेटपटूंनी प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे येथे क्रिकेट खेळणाऱ्यांसह फुटबॉल खेळणारे व योगा करण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच या मैदानात प्रभातफेरीसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असल्याने शहरातील अनेक नागरीक येथे सकाळी प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यामुळे हे मैदान नेहमी गजबजलेले ठरत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने तीन पाळ्यांत प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक मैदानात नियुक्त केले आहेत. तसेच दिवसा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदार देखील नियुक्त करण्यात आला आहे. मात्र रात्रीच्या वेळी या मैदानात परिसरातील काही मद्यपी मद्यपार्टीसाठी येत असल्याची माहिती अनेकदा मिळत असल्याने त्याकडे तैनात सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप मैदानात प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. त्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आल्या असुन त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. अखेर १४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास मद्यपींनी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या व खाद्यपदार्थ तसेच सोडून तेथुन पोबारा केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभातफेरी करणाय््राांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मैदानात उपस्थित असलेले कंत्राटदाराचे कर्मचारी प्रकाश कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच मैदानात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील समज दिल्याचे त्यांनी सांगितले. 

 

या मैदानात अनेक लहान मुले खेळण्यासाठी तर महिला व ज्येष्ठ नागरीक प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यांच्यासमोर असे प्रकार उघड होऊ लागल्यास ते मैदानात येणार नाहीत. परिणामी मैदानाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत.

-  प्रभातफेरीसाठी येणारे ज्येष्ठ नागरीक अजित पाटील 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर