शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भार्इंदरच्या बेकायदा रविवार बाजारामुळे वाहतूक कोंडी सुरूच, महापालिकेचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:41 IST

मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही.

मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊन प्रवासी व नागरिकांना या बाजाराचा मोठा जाच होत आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने दोन्ही रस्त्यांवरचा प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशाला देखील पालिकेने हरताळ फासला आहे.४ डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत त्यावेळी सत्ताधारी भाजपा व सोबत असलेल्या शिवसेना, बविआने भार्इंदर पोलीस ठाणे परिसरात पूर्वीपासून भरणा-या रविवार बाजारात केवळ स्थानिक मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बसू देण्याचा ठराव केला होता. सुरुवातीला जेमतेम महिना - दोन महिने कारवाईचे नाटक झाले. त्यातही क्रॉस गार्डनपर्यंत व नंतर पुढे थेट शिवसेना गल्लीपर्यंत सर्रास कपडा, कटलरी आदी फेरीवाले सर्रास बसू लागले.वास्तविक भार्इंदर रेल्वे स्थानकापासून थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतच्या प्रवाशांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे बेस्ट, एसटी, एमबीएमटी आदी बससेवांसह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची वर्दळ मोठी असते. आधीच या मार्गावर बेकायदा वाहनं उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली असते. त्यातच मुख्य रत्यावरील या बेकायदा फेरीवाल्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. शिवाय भुरट्या चोरया, पाकिटमारी व महिला - मुलींची छेड काढण्याचे प्रकार देखील घडत आहेत. फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा तसाच टाकला जातो. त्यात भर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर देखील रस्त्याचे काम सुरू असल्याने काही भागात केवळ अर्धा रस्ताच वापरात आहे. त्यामुळे येथे देखील वाहतुकीची कोंडी होत असते.भार्इंदर पश्चिमेचे सदर दोन्ही मुख्य मार्गच फेरीवाले, बेकायदा पार्किंग, हातगाड्या यांनी व्यापले असुन त्यातच रवीवार बाजार व रस्त्याचे सुरु असलेल्या कामा मुळे सर्वामान्य नागरीक मेटाकुटीला आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच स्पष्ट आदेश देऊन देखील महापालिका व सत्ताधारी यांना त्याचं गाभीर्य राहिलेलं नाही. मुळात या भागातून बक्कळ बाजार वसुली ठेकेदाराच्या मार्फत केली जाते. सदर ठेकेदार हा सत्ताधा-यांच्या मर्जीतला असल्याने त्याचे आर्थिक हित जपण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेMira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड