शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:22 AM

हरिभाऊ राठोड यांचा आरोप; १५ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन

ठाणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार भाजप सरकारने राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बंजारा आरक्षण, क्रिमीलेअर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार अशा प्रलंबित प्रश्नांवर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी १५ आॅक्टोबरला राज्यभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, केंद्र सरकारने २0१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत घटनेच्या काही अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्यात आली. एसईबीसी घोषित करण्याचे राज्याचे अधिकार काढून संसदेला दिले. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीत घ्यायचे झाल्यास संसदेची मंजुरी लागणार आहे. वास्तविक, घटनेच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत विधेयक चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीसंदर्भात विचार झाला असता, तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.‘मी देणार फॉर्म्युला’भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले, तरी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठीचा फॉर्म्युला मी सरकारला देणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा