शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले - राजन खान यांचे प्रतिपादन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:21 AM

कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.

कल्याण : कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.सार्वजनिक वाचनालय आणि अक्षरमानव यांच्या लेखन कार्यशाळेत ते बोलत होते. तुम्ही इतरांचा द्वेष करता तीही हिंसाच आहे. एखादी व्यक्ती दुसºया जातीची आहे, असे समजता तेव्हा तुम्ही हिंसाच करीत असता. संकुचित पिढीने लिहिलेले साहित्यही संकोचानेच येते. असे साहित्य काळाच्या कसोटीवर टिकणे शक्य नाही. चांगले लिहिण्यासाठी मेंदूने उदात्त होणे आणि माणूस होणे गरजेचे आहे. सगळ््या भाषा आपल्याच असतात. तसा प्रत्येक भाषेतील लेखकही आपला असतो. हा उदात्त हेतू ज्यांच्या साहित्यात होता, ते लेखकच टिकले. हिंसक लोक येतात व जातात. पण माणूस म्हणून जगण्याची सवय लावा, असा सल्ला त्यांनी कार्यशाळेत दिला.कथा, कादंबरी, कविता यात मूलत: एक कथाच असते. गोष्ट हा जगण्याचा मूलभूत पाया आहे. आपल्याला लेखक व्हायचे आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. लेखकाला जर तंत्रशैली सुचली नाही, तरी प्रथमत: जे सुचते ते कागदावर उतरवा. चांगला लेखक होण्यासाठी एका जागेवर ठिय्या मांडून बसण्याची ताकद हवी, असा सल्ला खान यांनी नवोदितांना दिला.कविता शिकवता येत नाही. ती अंगी असावी लागते. कवितेची कार्यशाळा गर्भसंस्कारासारखी असते. तसे संस्कार कवितेवर झाल्यास ती अधिक सशक्त आणि सदृढ बनते, असे नारायण लाळे यांनी सुचवले. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे निकष कवितेला लावू नका आणि गटातटांच्या राजकारणाला बळी पडू नका. त्यात नवोदित कवी भरकटत जातील आणि त्यांची कविता मरण पावेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.कविता चांगली की वाईट ही शोधता आली पाहिजे. प्रसिध्दीच्या मागे लागला नाहीत, तरी चांगली कविता प्रसिद्धी मिळवतेच. कविता हे लेखनव्रत आहे. ती जगणे म्हणजे जखम आणि जोखीम आहे. कवितेत वेगळेपणा महत्त्वाचा. ज्येष्ठांचे, अन्य साहित्यिकांचे वाचले नाही, तर कविता समृद्ध कशी होणार, असा सल्ला राजीव जोशी यांनी दिला.कथा बाळबोध, पाल्हाळीक नसावी. त्यात तपशील हवा पण साद्यंत घटनाक्रमाचा अट्टहास नको, यावर सुबोध जावडेकर यांनी भर दिला. तपशील जास्त असले, तर कथा सीमित होते. त्यात वाचक सहभागी होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या दृष्टीने कथा लिहिण्याचा सल्ला त्यांनी दिला. कादंबरी ज्या विषयावर लिहायची असेल त्या चौकटीत स्वत:ला बसावा; तरच अनुभव मांडता येतील. मानवी जीवनाचे सखोल चित्रण कादंबरीत व्हावे, अशी अपेक्षा डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केली.या कार्यशाळेला कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, मुंबई अशा विविध भागातून साधारण १०० च्या आसपास नवोदित लेखकांनी हजेरी लावली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही कार्यशाळा भरवल्याचे सांगत तिचा नवोदितांना फायदा होईल, असे वाचनालयाचे पदाधिकारी भिकू बारस्कर यांनी सांगितले.