शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

शुद्ध पाण्याकरिता ‘भगीरथ’ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:51 AM

मुरबाडच्या कासगावातील लोकसहभाग; ५० पैशांत मिळतेय एक लीटर शुद्ध पाणी

- पंकज रोडेकर ठाणे : मुरबाड तालुक्यातील कासगावाने लोकसहभागातून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला असून अवघ्या ५० पैशांमध्ये एक लीटर शुद्ध पाणी दिल्याने एक हजार लोकवस्तीच्या या गावातील साथीच्या आजारांवर नियंत्रण आले आहे.कामानिमित्त शहरी भागात राहताना येथील तरुणांनी शुद्ध पाण्याचे महत्त्व जाणले. गावाच्या मातीशी असलेले अतूट नाते जपून शहरी भागाप्रमाणे आपल्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिता यावे, म्हणून गावातील ‘पाडवा मित्र मंडळा’ने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे.कासगावाने आजूबाजूच्या गावांना एक रुपयात एक लीटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याने आजूबाजूच्या गावांमधील अनारोग्य दूर होण्यास हातभार लागला आहे. पाण्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अशुद्ध पाणी वाया न घालवता ते ठिबक सिंचनाद्वारे ५० झाडांसाठी वापरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा बहुमोल संदेश दिला आहे.मुरबाड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर सरळगावनजीक कासगाव आहे. या गावाने ठाणे जिल्ह्याला तब्बल १९ तलाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्याध्यापक दिलेले आहेत. तसेच एसटी महामंडळातही या गावातील सुपुत्र कार्यरत आहेत. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी कधीच झालेली नाही. येथे ग्रामपंचायतीवर बिनविरोध सदस्य निवडून दिले जातात. कासगावात खालची, वरची आणि मधली आळी अशा तीन आळ्या आहेत. या गावातील तरुणवर्ग नोकरीनिमित्त मुंबई, ठाण्याकडे जातो. शेती हाच या गावकºयांचा मूळ व्यवसाय आहे. या गावाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. काही वर्षांपासून माजी सिडको संचालक प्रमोद हिंदुराव आणि समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांच्या मदतीने गावकºयांनी लोकसहभागातून गावासाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाण्याची पाइपलाइन पोहोचली. ते पाणी, अंघोळ, कपडे, लादी पुसणे आदी कामांसाठी वापरले जाते.पुरस्कारांचे १६ लाख शिल्लक : या गावाला नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून गौरवताना १० लाख रुपयांचा पुरस्कार जिल्हा परिषदेने दिला आहे. तालुकास्तरावर स्वच्छता अभियानांतर्गत एक लाख, तर जिल्हास्तरावर पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोकण विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारातील काही रक्कम या प्रकल्पासाठी खर्च करता येईल का, यासाठी ग्रामसेवकांशी चर्चा करणार असल्याची माहिती गावाचे सरपंच टिकाराम पारध यांनी दिली.महिलांचा पुढाकारशुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे गावकºयांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व समजले आहे. गावाला ग्रामपंचायत, तसेच गावाने उभारलेल्या पाणपोईतून आणि शुद्ध पाण्याच्या प्रकल्पामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्याकरिता शुद्ध पाणी आणि इतर कामांसाठीही पाणी मिळत असल्याने आता ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होऊ लागलीआहे.रेल्वेस्थानकातील मशीनमुळे सुचली कल्पनाग्रामपंचायतीकडून मिळणाºया पाण्याचा जेथून पुरवठा होतो, त्या ठिकाणी विकास सुरेश यशवंतराव या तरुणाने जाऊन पाहिल्यावर त्याला धक्का बसला. हे पाणी पिणे आरोग्यास घातक असल्याचे त्यांनी सर्व गावकºयांच्या निदर्शनास आणले. ही गोष्ट साधारणत: मार्च महिन्यातील. त्यावर गावकºयांनी तत्काळ मीटिंग बोलवून ग्रामसेवकांशी चर्चा केली व नव्याने सरकारी पाणीयोजना आणण्याची मागणी केली. मात्र, नवी पाणीयोजना येण्यास वेळ लागेल, तोपर्यंत डागडुजी क रू, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.धीरज देशमुख नावाचा एक तरुण गावकºयांना शुद्ध पाण्याचे फिल्टर बसवण्यास वारंवार सांगत होता. पण, गावकºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. रेल्वेस्थानकावर माफक दरात मिळणाºया शुद्ध पाण्याच्या धर्तीवर गावासाठी काही करता येईल का, यावर गावकरी विचार करत होते. देशमुख याच्याकडे गावाकरिता शुद्ध पाणी पुरवण्याबाबत गावकºयांनी विचारणा केली. त्याच्या होकारानंतर, पैशांची अडचण उभी राहिली.गावकºयांच्या ‘पाडवा मित्र मंडळा’ने त्यांच्याकडे शिल्लक असलेले दोन लाख रुपये तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. बाळाराम यशवंतराव यांनी तत्काळ पाण्याची मोटार दिली, तर कृष्णा रामचंद्र यशवंतराव यांनी बोअरवेल करून दिली. ही बोअरवेल गावाच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत आणण्यासाठी गावकºयांनी ५०० मीटरची पाइपलाइन श्रमदानातून टाकली. त्यामुळे कासगावातील गावकरी आता लोकसहभागातून शुद्ध पाणी पित आहेत.हनुमान मंदिराजवळ शुद्ध पाण्याचे हे मशीन बसलेले आहे. गावकºयांमधील ताराचंद्र दत्तात्रेय चौधरी, मधुकर दाजी यशवंतराव, रमाकांत दत्तात्रेय यशवंतराव, शरद मोरेश्वर यशवंतराव, नंदकुमार विष्णू चौधरी, अशोक तुकाराम यशवंतराव, मनोहर रघुनाथ यशवंतराव, रमेश यशवंत यशवंतराव, अरविंद अनंत यशवंतराव, सुधीर जगन्नाथ चौधरी, मनोज दत्तात्रेय यशवंतराव, हनुमंत यशवंतराव आणि अनिल चौधरी आदी मंडळींनी याकरिता प्रयत्न केले.कॉइन आणि कार्डप्रणाली : गावकºयांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या प्रकल्पासाठी कॉइन आणि कार्डप्रणाली कार्यान्वित आहे. गावातील ५० कुटुंबांना कार्डवाटप केले असून ते कार्ड रिफील करावे लागते. त्यातील पैसे संपेपर्यंत ते कार्यान्वित राहणार आहे. या पैशांमधून लाइटबिल, देखभाल खर्च केला जाणार आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने पिण्यासाठी मोजकेच पाणी देण्याची सवय आता गावकºयांना लागल्याने त्यांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे.सध्या दोन हजार लीटर मिळतेयया प्रकल्पांतर्गत, पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, तर शुद्ध पाण्यासाठी दोन हजार लीटरची दुसरी टाकी बसवली आहे. साधारणत: गावकºयांना दिवसाला ५०० लीटर शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरेसे पडते. त्यामुळे दीड हजार लीटर पाणी शिल्लक राहत असल्याने आजूबाजूच्या गावकºयांना एक रुपया लीटरने ते देण्यास सुरुवात केली आहे. तर, यातून वितरित होणाºया पाण्याचा हिशेबही एका नोंदवहीत ठेवला जात आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे