शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

भार्इंदर पालिकेचे बेगडी पर्यावरणप्रेम

By admin | Published: February 13, 2017 4:41 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेचे पर्यावरणप्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी सरकारच्या वृक्षलागवड

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेचे पर्यावरणप्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी सरकारच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत शहरात २५ हजार झाडे लावण्याचा उदोउदो करणाऱ्या पालिकेने खरेदी केलेली काही रोपे व पिंजरे सात महिने झाले, तरी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. रोपे मरून गेली असून पिंजऱ्यांचा वापर आता कपडे सुकवण्यासाठी होऊ लागला आहे. सरकारने गेल्या वर्षी पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, म्हणून २ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मीरा-भार्इंदर महापालिकेनेही शहरात २५ हजार झाडे लावण्याची घोषणा केली. लाखो रुपये खर्च करून रोपे, लोखंडी पिंजरे, माती, शेणखत खरेदी करण्यात आले. त्या वेळी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांसह रोपांची लागवड करतानाची प्रसन्नमुद्रेने छायाचित्रे काढून घेतली. पण, पालिकेने देखभाल न केल्याने त्या वेळी लावलेल्या रोपांपैकी काही रोपे जगली नाहीत, तर काही रोपे लागवड न करताच ती उघड्यावर ठेवल्याने मरून गेली. रोपांच्या संरक्षणासाठी आणलेले पिंजरेही पडून होते. याबाबत, गेल्या वर्षी आॅगस्टमध्येच ही बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. तब्बल सात महिने झाले, तरी आजही रोपे मृतावस्थेत तशीच पडून आहेत. लोखंडी जाळ्यांच्या पिंजऱ्यांचा वापर नागरिक आता कपडे सुकवण्यासाठी सर्रास करू लागले आहे. (प्रतिनिधी)