शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:18 PM

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत.

मीरारोड - गोराईची मच्छीमार बोट समुद्रात बुडून 2 जण बेपत्ता झाले असताना भाईंदरच्या पाली येथील देवसंदेश हि मच्छीमार बोट किनाऱ्या पासून 40 किमी लांब खोल समुद्रात बंद पडली आहे . बोटीचे इंजिन बिघडले असून बोटीवरील 15 जण समुद्रात अडकले आहेत. 

पाली येथील नाखवा नेस्टर मुनीस यांची देवसंदेश हि मच्छीमार बोट मासेमारीसाठी 1 ऑगस्ट रोजी गेली होती . समुद्रात आलेल्या वादळीवारे आणि पावसामुळे मासेमारी साठी गेलेल्या बोटी परत किनाऱ्याला परंतु लागल्या . देवसंदेश देखील परत किनाऱ्याच्या दिशेने निघाली होती . परंतु किनाऱ्या पासून समुद्रात 40 किमी लांब अंतरावर असताना आज मंगळवारी दुपारी बोटीचे इंजिन बंद पडले . नाखवा व खलाशी आदींनी प्रयत्न करून देखील बोट सुरु झाली नाही. 

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत . सदर बाब मच्छीमार नेते माल्कम कासुघर , जॉर्जी गोविंद यांना कळताच अडकलेल्या मच्छीमारांना बोटी सह सुखरूप किनारी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . त्यांनी नौदल , तटरक्षक दल व मत्स्यविभागास मदतीसाठी विनंती केली आहे. मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी देखील तटरक्षक दलास पत्र देऊन अडकलेल्या  मच्छीमाराना सुखरूप परत आणण्याची विनंती केली आहे . तटरक्षक दल व नौदलाने देखील बोटीत अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत .