शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी ५.४५ ते पहाटेचे ७.४० रुग्णालयाने पाहिले १८ मृत्यु; ठाण्यात व्यक्त होतेय हळहळ

By जितेंद्र कालेकर | Updated: August 13, 2023 22:09 IST

शनिवारी सायंकाळी ५.४५ वा. ताप आणि श्वासाच्या त्रासाने आलेल्या कोपरीच्या सुनिल पाटील यांचा पहिला मृत्यू झाला.

ठाणे: शनिवारी रात्रीचे ९.४० ते रविवारी सकाळी ७.४० वाजेपर्यंतच्या दहा तासांमध्ये ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका मागून एक असे वेगवेगळया कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या पाच ते सहा तासांमध्येच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. अगदी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापासून ते ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी याठिकाणी धाव घेत प्रशासनाला याचा जाब विचारला. परंतू हे मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणा नसून रुग्णालयावरील अतिरिक्त ताणामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही तासांमध्ये १८ मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी सायंकाळी ५.४५ वा. ताप आणि श्वासाच्या त्रासाने आलेल्या कोपरीच्या सुनिल पाटील यांचा पहिला मृत्यू झाला. भानुमती पाधी या ८३ वर्षीय वृद्धेला ९ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. तिचा १३ आॅगस्टच्या रात्री ९.४० वा.दुसरा युरिनरी इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.  त्यानंतर ७ आॅगस्टला एका शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता या महिलेचा १०.४५ वाजता तिसरा मृत्यू झाला. नंतर १२ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता ताप आिण श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा त्याच रात्री ११.१५ वाजता मृत्यू ओढवला. तर रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे या चार वर्षीय बालकाला शहापूर येून ८ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. त्याचा १३ आॅगस्ट रोजी १२.५५ ला मृत्यू झाला. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातातील श्वासोच्छोवासाच्या त्रास असलेल्या ललीताबाई चव्हाण (४२) हिचा रविवारी पहाटे १.१५ वाजता सहावा मृत्यू झाला.

पुढे काही मिनिटांच्या अंतराने तिघांनी प्राण सोडले. यात १२ आॅगस्टला बेशद्धावस्ेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जैस्वाल (५३) यांचा रविवारी पहाटे २.५३ वाजता आठवा मृत्यू झाला. तर तीन मिनिटांनी पहाटे २.५६ वाजता ताराबाई घगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. त्यानंतर २.५७ वाजता शस्त्रक्रिया विभागातील भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. पहाटेच्या ३.१५ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेटच्या सुनिता इंदूलकर (७०) यांचा अकरावा तर ३.२६ वा नूर खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा १२वा मृत्यू झाला.

३.३० वाजता एकाचवेळी सनदी मो. हसन (६६) या महिलेचा, निनाद लोकुर (५२) या कल्याणच्या पुरुषाचा, अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. पुढे पहाटे ४ वाजता निमोनियाच्या भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा आणि सकाळी ७.४० वाजता अशोक निचल या ८१ वर्षीय वृद्धाचा १८ वा मृत्यू झाला. एका मृत्यूच्या माहितीमुळे दुसºयाचे नातेवाईक सावरत असतांना त्यांना आपल्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती बाहेर येत होती. त्यामुळे एका मागून एक डॉक्टर आणि परिचारिकांची याठिकाणी धावपळ सुरु असतांनाच रुग्णांच्या नातेवाईकांचे आक्राेश आिण विव्हळने भल्या पहाटे सुरु हाेते.या सर्वांचे मृत्यू वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र त्यांना वाचविण्यात अपयश आले. यात कोणीही हलगर्जीपणा केलेला नसल्याचा दावा अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी केला असला तरी या मृत्यूंबद्दल संपूर्ण शहरातून रुग्णालय प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाDeathमृत्यू