शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 23, 2016 03:05 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

बदलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यातील अनेक घरांसाठी योजनेच्या लाभार्थांनी पालिकेकडे पैसे देखील भरले आहेत. मात्र तीन वर्ष झाले तरी या लाभार्थांना अद्याप घरे मिळालेली नाही. त्यामुळे या बीएसयूपी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.राज्यातील सर्वात कमी झोपडपट्टी असलेल्या शहरांपैकी एक शहर म्हणजे बदलापूर. बदलापूरमध्ये सर्वाधिक कमी झोपडपट्टी असल्याने हे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २०१० मध्ये केंद्र, राज्य सरकार आणि पालिका यांच्या मदतीने बीएसयूपी योजना राबविण्यात आली. या योजनेचे २०१२ मध्ये पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले. तयार झालेली घरे मिळावी यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी ३५ ते ४५ हजारापर्यंत रक्कम पालिकेकडे भरली होती. आपल्या हक्काचे घर मिळेल या आशेवर त्यांनी कर्ज घेऊन ही रक्कम पालिकेकडे भरली. मात्र ही रक्कम भरुन तीन वर्ष झाले तरी या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही. बदलापूर एकमेव शहर आहे की जेथे बीएसयूपी योजनेचे काम पूर्ण होत असतानाही लाभार्थी मात्र घरांपासून वंचित राहिले आहे. लाभार्थी पालिकेत नियमीत पाठपुरावा करत असून त्यांच्या वाट्याला केवळ आश्वासनेच येत आहेत. बदलापूरमधील म्हाडा कॉलनी परिसरातील तयार घरांचे वाटप करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी घरांची सोडतही काढली होती. त्यानुसार त्या लाभार्थ्यांना घराचे वाटप करण्यात आले. मात्र घर मिळाले असले तरी त्याचा ताबा मिळाल्याचे पत्र अद्याप पालिकेने दिलेले नाही. तर सोनिवली येथे इमारती तयार असतानाही लाभार्थीना घरांचे वाटप केलेले नाही. (प्रतिनिधी)