शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उज्ज्वला गॅसचे लाभार्थी पुन्हा चुलीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 00:06 IST

ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती : ८१९ रुपयांचा गॅस कसा परवडेल?

सुरेश लोखंडे

ठाणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे मिळणारा गॅस मोफत मिळत नाही. सद्य:स्थितील तब्बल ८१९ रुपयांस गॅस सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे या योजनेच्या जिल्ह्यातील ४४ हजार १५२ महिला लाभार्थी गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. 

जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांतील महिलांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात आले. त्यासोबत काही रक्कम घेऊन शेगडीही दिली. मात्र, दरमहा गॅस सिलिंडर मोफत  देण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे दरमहा वाढणाऱ्या गॅसच्या किमतीला या गरीब कुटुंबीयांना नाहक तोंड द्यावे लागत आहे.  रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या या कुटुंबीयांना २३८ रुपये मजुरी मिळत आहे. त्यात घराचा खर्च करीत असतानाच या गॅससाठी ८१९ रुपये भरणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. सर्वच ठिकाणी जीव घेणारी महागाई आता गरिबांच्या मुळावरच उठली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या परिवारास सावरण्यासाठी जिल्ह्यातील या ४४ हजार १५२ महिलांनी महागडे गॅस सिलिंडर घेण्याएवेजी पारंपरिक पद्धतीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे ही याेजनात अडचणीत सापडली आहे.

सिलिंडर घेणे परवडत नाही

गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा झालेली नाही. या योजनेमार्फत केवळ १०० रुपयांना शेगडी व गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, आज ही योजना बारगळली असून यासाठी गॅस सिलिंडर ज्या किमतीला सर्वसामान्यांना मिळतो त्याच किमतीला तो दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना मिळत असल्यामुळे तीव्र संताप आहे. गॅसची किंमत कमी करून भरीव अनुदानाची रक्कम शासनाने पुन्हा बँक खात्यात जमा करावी.     - साखर पाखरे, उल्हासनगरगेल्या चार वर्षापूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात आले. मात्र, गॅस  सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ते बंद केले आहे. सध्या लाकडेच जमा करून चुलीवर स्वयंपाक सुरू केले आहे.     - दिलीप जाधव, बिरवाडी

 आम्ही मजुरी करणारी माणसे आहोत. त्यामुळे एकदम सातशे, आठशे रुपये गॅस सिलिंडरच्या टाकीसाठी खर्च करणे आम्हाला शक्य नाही. आम्ही तिचा वापर करणे बंद केले आहे.        - दत्ता मुकणे, भातसानगर

चुलीवर स्वयंपाक करणे आमच्यासाठी योग्य आहे. सिलिंडरचा भावही अधिक असल्यामुळे गॅस विकत घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. महागडे सिलिंडर गरिबांना परवडत नाही.        - यशवंत हिलम, ग्रामस्थ

nएक वर्षापूर्वी गॅसच्या वाढीव किमतीवर सर्वांनाच २५ ते ६० रुपयांपर्यंत सबसिडीची रक्कम बँकेत जमा होत असे. परंतु, आता गॅस सबसिडी अनुदान रक्कमही एक वर्षापासून बंद झाली आहे. nत्यातच आता सिलिंडरची मनमानी वाढलेली किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे या गरिबांसह सर्वसामान्य परिवाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सबसिडीची रक्कम बंद करण्याची मनमानी सुरू असतानाच या उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शनही सप्टेंबर २०१९ पासून बंद केले आहे.n यामुळे सप्टेंबर ते ऑगस्ट २०२० दरम्यान कनेक्शनही देण्यात आले नाही. एकीकडे या योजनेच्या अनुदानाची रक्कम बंद करून योजनाही बंद करीत गॅस सिलिंडरची किंमत वाढविण्यात येत असल्यामुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. nजिल्ह्यात उज्ज्वला गॅसचे ६० हजार २८३ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठरवले हाेते. मात्र यापैकी संपूर्ण जिल्हाभरात ४४ हजार १५२ गॅस कनेक्शनचेच लक्ष्य गाठण्यात यश प्रशासनास आले आहे. n या याेजनेपासून अनेक कुटुंबे वंचित राहिली हाेती. मात्र, आता सिलिंडरच महागल्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनीही पुन्हा सिलिंडर खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने या याेजनेचे भवितव्यच संकटात सापडले आहे.

टॅग्स :thaneठाणे