शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 21:59 IST

आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत.

मीरारोड - आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. या पशु - पक्ष्यांसाठीच्या सामुहिक पाणपोर्इंचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबवला जात आहे.शहरातील हॅण्ड फौंडेशन च्या वतीनेपहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या वेळी उन्हाळा तिव्र जाणवु लागलाय. पाण्याचे साठी झपाट्याने आटु लागले आहेत. शहरात देखील पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. उष्म्या मुळे तहान वाढली आहे. माणुस पाणी पिण्याची सोय कशीही करु शकतो.परंतु भटके श्वान, मांजर, खारुताई, चिमणी, कावळा, साळूंकी, कबुतर आदी विविध पशु व पक्ष्यांना मात्र तहान भागवण्यासाठी शुध्द पाण्याची सोय तशी नसतेच. त्यातही वाढत्या गरमी मुळे त्यांची तहान देखील वाढते.मग अशा पशु - पक्ष्यांसाठी आपण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय कशी करु शकतो यावर संस्थेचे अध्यक्ष फ्रांसिस लोबो , सचीव रविंद्र भोसले, खजिनदार नंदिनी पानिकर,संतोष मिश्रा, नामदेव काशिद, श्रृती सावंत, प्रमोद जैन आदींनी विचार विनीमय करण्यास सुरवात केली.त्यातुन आपण शहरात आवश्यक अशी ठिकाणं निवडुन तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करु शकतो असं ठरलं. सरीता रातुरी यांनी पाणी ठेवण्यााठी सिमेंटची घमेल्याच्या आकाराची भांडी देण्याची जबाबदारी घेतली.पण भांडी लावल्या नंतर त्या मध्ये नियमीत पणे स्वच्छ पाणी टाकण्याच काम कसं करायचा असा प्रश्न पडला. पण तो प्रश्न देखील शहरातील पशुप्रेमींनी सोडवलाय.शहरात अनेक भागात पशु व श्वान प्रेमी नागरीक राहतात. ते नित्यनेमाने या भटक्या श्वान आदिंना दूध, पाणी, अन्न देत असतात. त्यांची देखभाल व औषधोपचार सुध्दा करत असतात. त्यामुळे पाण्याच्या भांड्यां मध्ये नियमीत पाणी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या कडे सोपवण्याची विचारणा केली गेली. आणि त्या पशुप्रेमींनी लागलीच ती जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली.यंदाचा कडक उन्हाळा पाहता पहिल्यांदाच या सामुहिक पशु-पक्षी पाणपोईची संकल्पना राबवण्याचा विचार केला. शहरात आता पर्यंत २५ ठिकाणी आम्ही पाणी साठवणारी सिमेंटची भांडी लावलेली आहेत. नागरीकांनी देखील सहकार्य केले तर नियमीतपणे या भांड्यां मध्ये पाणी भरुन राहिल. जेणे करुन परिसरातील भटके श्वान, मांजर, गुरं - ढोरं सह अन्य पशु व पक्ष्यांची तहान आपण भागवु शकतो असं संस्थेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या