शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विटावा ते कोपरी पुलाच्या होऊ घातलेल्या कामावरुन शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 14:46 IST

विटावा पुलाच्या होऊ घातलेल्या कामाच्या श्रेयावरुन आता पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद उफाळला आहे. या दोघांनीही माझ्यामुळेच हा पुल मार्गी लागत असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देत्या बैठकीला शिवसेना आमदार, खासदारांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतेपुलासाठी मीच केला पाठपुरावा, श्रीकांत शिंदे यांचा दावा

ठाणे - कळवा खाडी पुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरु असतांना आता शासनाने विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पुलाची उभारणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु आता भविष्यात होऊ घातलेल्या या पुलाच्या कामावरुन देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या म्हणन्यानुसार हे काम माझ्यामुळे झाले आहे, तर मुळात या खाडी पुलाचा प्रस्तावासाठी मीच आग्रही होतो असा दावा शिवसेनेच्या खासदाराने केला आहे. त्यातही हा पुल पालिका बांधणार की, एमएमआरडीए याबाबतही या दोघांनी केलेले व्यक्तव्य वेगवेगळे आहे. त्यामुळे या पुलाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.                  विटावा ते कोपरी खाडी पुल उभारण्यात यावा तसेच कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. त्यानुसारच या दोनही कामांना राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर यातील विटावा पुलाचे काम महापालिकेने करावे आणि कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्त्याचे काम राज्य शासनाची जबाबदारी असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही आव्हाडांनी स्पष्ट केले होते.दरम्यान या पुलाच्या कामासाठी मागील अडीच वर्षे पाठपुरावा करण्यात आल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यानुसार या पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. केवळ या पुलाचेच नाही तर येथे होत असलेल्या स्कायवॉकवरही शिंदे यांनी दावा ठोकला असून माझ्याच प्रयत्नामुळे हे कामही मार्गी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विटावा पुलाबाबतचा पाठपुरावा मुख्यमंत्री, एमएमआरडीए आणि महापालिका आयुक्त स्तरावर सुरु असल्याचे सांगत केव्हा केव्हा कशा पध्दतीने याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता, याचे तारेखीनिशी पुरावे देखील शिंदे यांनी आता सादर केले आहेत.मंगळवारी ठाणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या व्यक्तीरीक्त खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्यतिरिक्त ठाण्यातील अन्य कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यात कितपय तथ्य आहे, हे तपासण्याची वेळ आता आली आहे. एकूणच आता पुन्हा कळव्यात आमदार विरुध्द खासदार असा संघर्ष सुरु झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShrikant Shindeश्रीकांत शिंदे