शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विटावा ते कोपरी पुलाच्या होऊ घातलेल्या कामावरुन शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 14:46 IST

विटावा पुलाच्या होऊ घातलेल्या कामाच्या श्रेयावरुन आता पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद उफाळला आहे. या दोघांनीही माझ्यामुळेच हा पुल मार्गी लागत असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देत्या बैठकीला शिवसेना आमदार, खासदारांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतेपुलासाठी मीच केला पाठपुरावा, श्रीकांत शिंदे यांचा दावा

ठाणे - कळवा खाडी पुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरु असतांना आता शासनाने विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पुलाची उभारणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु आता भविष्यात होऊ घातलेल्या या पुलाच्या कामावरुन देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या म्हणन्यानुसार हे काम माझ्यामुळे झाले आहे, तर मुळात या खाडी पुलाचा प्रस्तावासाठी मीच आग्रही होतो असा दावा शिवसेनेच्या खासदाराने केला आहे. त्यातही हा पुल पालिका बांधणार की, एमएमआरडीए याबाबतही या दोघांनी केलेले व्यक्तव्य वेगवेगळे आहे. त्यामुळे या पुलाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.                  विटावा ते कोपरी खाडी पुल उभारण्यात यावा तसेच कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. त्यानुसारच या दोनही कामांना राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर यातील विटावा पुलाचे काम महापालिकेने करावे आणि कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्त्याचे काम राज्य शासनाची जबाबदारी असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही आव्हाडांनी स्पष्ट केले होते.दरम्यान या पुलाच्या कामासाठी मागील अडीच वर्षे पाठपुरावा करण्यात आल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यानुसार या पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. केवळ या पुलाचेच नाही तर येथे होत असलेल्या स्कायवॉकवरही शिंदे यांनी दावा ठोकला असून माझ्याच प्रयत्नामुळे हे कामही मार्गी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विटावा पुलाबाबतचा पाठपुरावा मुख्यमंत्री, एमएमआरडीए आणि महापालिका आयुक्त स्तरावर सुरु असल्याचे सांगत केव्हा केव्हा कशा पध्दतीने याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता, याचे तारेखीनिशी पुरावे देखील शिंदे यांनी आता सादर केले आहेत.मंगळवारी ठाणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिंदे यांच्या व्यक्तीरीक्त खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्यतिरिक्त ठाण्यातील अन्य कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यात कितपय तथ्य आहे, हे तपासण्याची वेळ आता आली आहे. एकूणच आता पुन्हा कळव्यात आमदार विरुध्द खासदार असा संघर्ष सुरु झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShrikant Shindeश्रीकांत शिंदे