शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

खातिवलीमधील डोंगरपाड्यातील विहिरीने गाठला तळ; ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:23 AM

प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

अनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदी असलेल्या वासिंद गावाजवळील धनिक ग्रामपंचायत असलेल्या खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपाड्यातील विहिरीने तळ गाठल्याने येथील आदिवासीपाड्यावर सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. पंचायत हद्दीत असलेल्या आदिवासी डोंगरपाडा येथील आदिवासींसाठी एकमेव विहीर तसेच बोअरवेल आहे.

आदिवासींना वर्षभर पाण्यासाठी या तुटपुंज्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या कुटुंबीयांना कायमस्वरूपी पाणी देण्याची कोणतीही तरतूद आजपर्यंत होत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सध्या विहिरींचे पाणी आटले असून बोअरवेलचे पाणीदेखील तळाला गेले असल्याने खातिवली ग्रामपंचायतीतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. योजना सुरू ठेवणे, ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तांत्रिक अडचणी असल्यास आम्ही सहकार्य करू, असे उपकार्यकारी अभियंता एम.बी. आव्हाड, पाणीपुरवठा विभाग, पं.स. शहापूर यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यातील विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. प्रसंगी खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळही या ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी मिळेल अशी आशा आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी आमची वणवण थांबवा अशी विनंती महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. रणरणच्या उन्हात ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे.

३७ लाखांची योजना झाली होती मंजूर२००६-०७ ला आदिवासी उपयोजनेतून खातिवली येथील फणसीपाडा, डोंगरपाडा, मोरावणेपाडा आणि कातकरीवाडी या आदिवासी वस्तीसाठी ३७ लाखांची नळपाणीयोजना मंजूर करण्यात आली होती. पुढे ती योजना कधीही पूर्णत्वास गेली नसल्याचे कागदोपत्री दिसते.- देविदास जाधव, माजी उपसरपंच तथा सदस्य, ग्रामपंचायत, खातिवली

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई