Join us  

दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 5:08 PM

सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स करणं सोप्पं नव्हतं अशी प्रतिक्रिया 29 वर्षीय अभिनेत्रीने दिली आहे.

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' (Heeramandi) सीरिजला सध्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झाली आहे. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, शरमिन सहगल या अभिनेत्रींनी सीरिजमध्ये काम केलं आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या हीरामंडीतील महिलांवर ही कथा आधारित आहे. सीरिजमध्ये अनेक इंटिमेट सीन्सही दाखवण्यात आले आहेत. २९ वर्षीय अभिनेत्री श्रुती शर्माने 'सायमा' ही भूमिका साकारली आहे. श्रुतीने सीरिजमध्ये दिलेल्या इंटिमेट सीन्सनंतर त्रासदायक अनुभव सांगितला आहे.

'हीरामंडी'सीरिज जितकी लोकप्रियता मिळवत आहे तितकंच काही लोक टीकाही करत आहेत. सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स करणं सोप्पं नव्हतं अशी प्रतिक्रिया अभिनेत्री श्रुती शर्माने दिली आहे. एंटरटेन्मेंट लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,"एका सीनमध्ये मी आणि मल्लिकाजानच्या ड्रायव्हरच्या भूमिकेत असलेला रजत आमच्यात रोमँटिक सीन होतो. अशा प्रकारचा रोमँटिक सीन मी पहिल्यांदाच स्क्रीनवर केला. आम्ही फिरत फिरत बोलत असतो आणि ही नक्कीच कठीण कोरिओग्राफी आहे हे तुम्हीही ओळखलंच असेल. माझ्या शरीरावर रॅशेस आले होते. आम्ही तो सीन दिवसभर शूट करत होतो. सीन शूट करुन झाल्यावर धूळीने माझं काजळ खराब झालं होतं. पण सीरिजमध्ये हा सीन खूप सुंदर दिसतो आहे."

श्रुती आणि रजतचं यामध्ये सिक्रेट अफेअर सुरु असतं. त्या सीनमध्ये रजत म्हणजेच इकबाल खूपच तणावात असतो. सायमा त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा गवतावर दोघंही रोमान्स करतात असा तो सीन आहे. श्रुती एका मुलाखतीत असंही म्हणाली होती की, 'संजय सर जेव्हा काही ठरवतात तेव्हा ते कलाकारांची निवड करण्यात एकदम तरबेज असतात. आपण त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुच शकत नाही.

टॅग्स :संजय लीला भन्साळीसेलिब्रिटीवेबसीरिज