शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

खातिवलीमधील डोंगरपाड्यातील विहिरीने गाठला तळ; ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:23 IST

प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

अनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदी असलेल्या वासिंद गावाजवळील धनिक ग्रामपंचायत असलेल्या खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपाड्यातील विहिरीने तळ गाठल्याने येथील आदिवासीपाड्यावर सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. पंचायत हद्दीत असलेल्या आदिवासी डोंगरपाडा येथील आदिवासींसाठी एकमेव विहीर तसेच बोअरवेल आहे.

आदिवासींना वर्षभर पाण्यासाठी या तुटपुंज्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या कुटुंबीयांना कायमस्वरूपी पाणी देण्याची कोणतीही तरतूद आजपर्यंत होत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सध्या विहिरींचे पाणी आटले असून बोअरवेलचे पाणीदेखील तळाला गेले असल्याने खातिवली ग्रामपंचायतीतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. योजना सुरू ठेवणे, ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तांत्रिक अडचणी असल्यास आम्ही सहकार्य करू, असे उपकार्यकारी अभियंता एम.बी. आव्हाड, पाणीपुरवठा विभाग, पं.स. शहापूर यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यातील विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. प्रसंगी खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळही या ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी मिळेल अशी आशा आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी आमची वणवण थांबवा अशी विनंती महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. रणरणच्या उन्हात ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे.

३७ लाखांची योजना झाली होती मंजूर२००६-०७ ला आदिवासी उपयोजनेतून खातिवली येथील फणसीपाडा, डोंगरपाडा, मोरावणेपाडा आणि कातकरीवाडी या आदिवासी वस्तीसाठी ३७ लाखांची नळपाणीयोजना मंजूर करण्यात आली होती. पुढे ती योजना कधीही पूर्णत्वास गेली नसल्याचे कागदोपत्री दिसते.- देविदास जाधव, माजी उपसरपंच तथा सदस्य, ग्रामपंचायत, खातिवली

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई