शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बारवी धरण भरले, चार दरवाजे उघडून पाण्याच्या विसर्गास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:43 IST

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले.

 -सुरेश लोखंडेठाणे : अंबरनाथ तालुक्यातील एम आयडीसीच्या मालकीचे बारवी धरण रात्री 10.30 भरले असून त्याचे चार गेटमधून पाणी वाहू लागले आहे.  या बारवी धरणाची पातळी 72.60 मीटर असून ती आज पूर्ण भरली आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले जाऊन त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे . बारवी धरण भरण्यास गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना विलंब झाला आहे. या धरणात आता मुबलक पाणी साठा तयार झाल्यामुळे ठाणेच्या काही भागासह कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह अंबरनाथ, बदलापून नगर परिषद, जिल्ह्यातील सर्व एम आयडीसील परिसर, कारखाने, आणि भिवंडीसह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गांवखेड्यांच्या पाणी कपातीची समस्या मिटली आहे. 

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले. रविवारी रात्री 10.30 वाजता या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याचे ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार असल्याचा आंदाज घेऊन गुरुवारीच भातसा धर्माप्रमाणे या बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरण व नदी काठावरील अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधी तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत देण्यात आला आहे. या मध्ये अस्नोली, राहटोली, चोण, सागांव पाटीलपाडा, चांदप, पादीर पाडा, पिंपळोली , कारंद, चांदप पाडा आदी गांवांसह नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एम आयडीसी क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात आज रात्री पासून जोरदार पाऊस सुरु आहे. 86 मिमी पाऊस सकाळपर्यंतधरणात पडला आहे.  आता यााबारवी धरणात 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. रविवारी धरणाची 72.60 पैकी केवळ 0.23 सेंटीमीटर पाणी पातळी पैकी भरण्यासाठी  बाकी होती. या धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता गुरुवारी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या धरणासह बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पात्रात व वाहत्या पाण्यााची पातळी वाढणार असल्यामुळे या पाण्यात उतरण्याला बंदी घातली आहे.या सतर्कता इशारा स्थानिक प्रशासनाकडून संबंधित गावांना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सीईओ शिवाजी पाटील यांनी गुरुवारीच जारी केले आहेत. याशिवाय या धरणाची मालकी असलेल्या एम आयडीसी विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही संबंत प्रशासनास सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणे