शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बारवी धरण भरले, चार दरवाजे उघडून पाण्याच्या विसर्गास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:43 IST

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले.

 -सुरेश लोखंडेठाणे : अंबरनाथ तालुक्यातील एम आयडीसीच्या मालकीचे बारवी धरण रात्री 10.30 भरले असून त्याचे चार गेटमधून पाणी वाहू लागले आहे.  या बारवी धरणाची पातळी 72.60 मीटर असून ती आज पूर्ण भरली आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले जाऊन त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे . बारवी धरण भरण्यास गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना विलंब झाला आहे. या धरणात आता मुबलक पाणी साठा तयार झाल्यामुळे ठाणेच्या काही भागासह कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह अंबरनाथ, बदलापून नगर परिषद, जिल्ह्यातील सर्व एम आयडीसील परिसर, कारखाने, आणि भिवंडीसह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील गांवखेड्यांच्या पाणी कपातीची समस्या मिटली आहे. 

रविवारी दुपारी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या धरणावर जलपुजन करण्यात आले असून  ते आज रात्री तुडुंब भरुन वाहू लागले. रविवारी रात्री 10.30 वाजता या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याचे ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार असल्याचा आंदाज घेऊन गुरुवारीच भातसा धर्माप्रमाणे या बारवी धरणाखालील व या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरण व नदी काठावरील अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधी तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत देण्यात आला आहे. या मध्ये अस्नोली, राहटोली, चोण, सागांव पाटीलपाडा, चांदप, पादीर पाडा, पिंपळोली , कारंद, चांदप पाडा आदी गांवांसह नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एम आयडीसी क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात आज रात्री पासून जोरदार पाऊस सुरु आहे. 86 मिमी पाऊस सकाळपर्यंतधरणात पडला आहे.  आता यााबारवी धरणात 95.35 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. रविवारी धरणाची 72.60 पैकी केवळ 0.23 सेंटीमीटर पाणी पातळी पैकी भरण्यासाठी  बाकी होती. या धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता गुरुवारी वर्तवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या धरणासह बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पात्रात व वाहत्या पाण्यााची पातळी वाढणार असल्यामुळे या पाण्यात उतरण्याला बंदी घातली आहे.या सतर्कता इशारा स्थानिक प्रशासनाकडून संबंधित गावांना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सीईओ शिवाजी पाटील यांनी गुरुवारीच जारी केले आहेत. याशिवाय या धरणाची मालकी असलेल्या एम आयडीसी विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही संबंत प्रशासनास सतर्कतेचा इशारा आधीच दिला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणे