शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर संगणक चालकांचा संप मागे; पालिकेचे राज्य सरकारला सकारात्मक अभिप्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 17:46 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकांनी २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन अखेर ५ फेब्रुवारीला प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या सकारात्मक अभिप्रायामुळे मागे घेतले.  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकांनी २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन अखेर ५ फेब्रुवारीला प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या सकारात्मक अभिप्रायामुळे मागे घेतले.  गेल्या १० वर्षांपासून पालिका आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरुपात संगणक चालक  व लघुलेखकाचे काम करणा-या ६८ कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे सेवेत कायम करण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर १९ मे २०१७ रोजीच्या महासभेत त्या कर्मचाऱ्यांना लिपिक व टंकलेखक या पदावर कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मात्र त्याला प्रशासनाने रद्द करण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये राज्य सरकारकडे पाठविला. त्यात महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५३ (३) नुसार स्थायी समितीची पुर्वपरवानगी खेरीज महासभेत मंजूर करण्यात आलेला ठराव नियमबाह्य असल्याचा दावा प्रशासनाकडुन करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ त्या कर्मचाऱ्यांनी २२ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले. तत्पूर्वी प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रातील वस्तुस्थिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यासाठी नरेंद्र मेहता यांनी २९ डिसेंबर २०१७ रोजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. त्यात त्यांनी  संगणक चालकांच्या पदांना मान्यता देण्यासह ठोक मानधनावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या संगणक चालकांना लिपिक व टंकलेखक पदावरच कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. अखेर राज्य सरकारने पालिकेला पाठविलेल्या पत्रात मेहता यांनी दिलेल्या पत्रावर सविस्तर अभिप्राय देण्याचे निर्देश पालिकेला दिले. यामुळे नरमलेल्या प्रशासनाने अभिप्राय देण्याची कार्यवाही गेल्या चार दिवसांपासुन सुरु करीत कर्मचा-यांची साधी संगणकाची परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी त्याला अमान्य केल्याने अखेर नरमलेल्या प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना लिपिक व टंकलेखक पदावर सामावुन घेण्याबाबत राज्य सरकारला सोमवारी पत्र दिले. त्यात सरकारने वेळावेळी विविध आस्थापनांतील अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी धोरण बदलल्याचे दाखले प्रशासनाकडून देण्यात आले असून पालिकेत संगणक चालक व लघुलेखकाची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायमस्वरुपी सामावुन घेण्याच्या आशा पल्लवित झाल्याने त्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन मागे घेतले. 

टॅग्स :agitationआंदोलन