शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच बळीराजा आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 2:53 AM

सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन

ठाणे : पूर्वी राजेशाहीतील लूट समजून यायची; पण लोकशाहीत ‘खळं’ लुटले जात असतानाही आम्हाला उमगले नाही. शेतकऱ्याला लुटणारा ‘गब्बर’ कळलाच नाही. बाजार समित्यांच्या या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच ‘बळीराजा’ खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी केले. सरस्वती सेंकडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर बळीराजा’ हे चौथे पुष्प सोमवारी खोत यांनी गुंफले. यावेळी आ. संजय केळकर यांनी प्रास्ताविक केले. 

केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार असताना गेले काही दिवस दिल्लीच्या तख्तावर आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी आपली भूमिका विशद केली. हमीभावाने खरेदीची लेखी हमी सरकार देण्यास तयार असतानाही शेतकरी संपेल, अशी अनाठायी भीती दाखवून सुरू असलेल्या पंचतारांकित आंदोलनाला आता राजकीय वास येत आहे. कायदेच रद्द करा, असे म्हणणे झुंडशाहीचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर नंतरच्या राजेशाहीत बळीराजाची लूटच होत होती, ती समजून यायची. शोले चित्रपटातील ‘गब्बर’ गावात दवंडी पिटून लुटायचा. मात्र, लोकशाहीत लुटणारे हे ‘गब्बर’ आपल्याला कळलेच नाहीत.

राजकारण्यांनी या लुटीची व्यवस्थाच करून ठेवली आहे, आधी शेतकऱ्याच्या शेतमालावर लेव्ही लावली, नंतर झोनबंदी, तालुका, जिल्हा, प्रांत, राज्यबंदी आणि निर्यातबंदी केली. हे कमी म्हणून परदेशातून स्वस्त माल आयात करून इथले उत्पादन मातीमोल केले. त्यावर बाजार समित्या नेमून नात्यागोत्यांना खरेदी-विक्रीचे परवाने देऊन सेस लावला. खरेदीदार तेच, व्यापारी तेच, अडते आणि दलालही तेच. यांच्यावर राजकारण्यांची माणसे संचालकपदी नेमून बळीराजाची पिळवणूक केली जाते. खरेदी केलेला माल गोदामात सडवून शेकडो कोटींचे घोटाळे करायचे. बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने असून या कत्तलखान्यातून शेतकरी मुक्त झाला तरच आत्मनिर्भर बनेल, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत thaneठाणे