शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी बोगस पंचनामे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:03 AM

कर्जत तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सध्या गॅस कंपनी धावपळ करीत आहे. त्यासाठी कायदा बाजूला ठेवून शेतकºयांच्या जमिनी मिळवण्याचा सपाटा आपल्या मध्यस्थांमार्फत कंपनीचे अधिकारी करीत आहेत.

कर्जत : तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सध्या गॅस कंपनी धावपळ करीत आहे. त्यासाठी कायदा बाजूला ठेवून शेतकºयांच्या जमिनी मिळवण्याचा सपाटा आपल्या मध्यस्थांमार्फत कंपनीचे अधिकारी करीत आहेत. मात्र ज्या शेतकºयांच्या हरकती असतील त्या शेतकºयांना अंधारात ठेवून त्या जमिनीचे पंचनामे स्थानिकांना हाताशी धरून केले जात आहेत. नेरळ अवसरे भागात स्थानिक पोलीस पाटलांकडून बोगस पंचनामे केल्याचे आढळून आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्याचवेळी महसूल खात्याचे कर्मचारी देखील गॅस कंपनीसाठी दप्तरे घेऊन जात असल्याचे दिसून येत आहेत.कर्जत तालुक्यात पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून गॅस पाइपलाइन येत असून कडाव येथील केंद्रातून या पाइपलाइन पुढे जाणार असून त्या पाइपलाइन आपल्या जमिनीतून टाकण्यास शेतकºयांचा विरोध आहे. शासनाने जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट दर शेतक ºयांना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. परंतु कर्जत तालुक्यातील शेतकºयांची फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकºयांच्या समस्यांमध्ये आता आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. कारण रिलायन्स गॅस कंपनीने शेतकºयांचा विरोध लक्षात घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून पाइपलाइनचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांना कोणता शेतकरी विरोध करणार हे माहीत असल्याने महसूल खाते आणि स्थानिकांनी एकत्र येऊन पंचनामे केले आहेत. ते पंचनामे करताना शेतकºयांना अंधारात ठेवून सर्व पंचनामे उरकण्यात आले आहेत ते आता उघड होत असून आता अवसरे, निकोप भागातील शेतकºयांनी प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कर्जत येथील विश्रामगृहात गॅस पाइपलाइनच्या मध्यस्थाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आमच्या जमिनीचे अधिकार आम्ही कोणाला दिले नसताना पंचनामे करण्याचा अधिकार पोलीस पाटलांना कोणी दिला असा आक्षेप घेत आमच्या जमिनीतून पाइपलाइन टाकण्यास आमचा विरोध असल्याचे लेखी पत्र संबंधित मध्यस्थांना निकोप, मोहिली, अवसरे, बिरदोले येथील शेतकºयांनी दिले आहे. त्यामुळे रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीला शेतकºयांना अंधारात ठेवून केलेले पंचनामे रद्द करण्याची वेळ आली आहे. स्थानिक पोलीस पाटलांनी मागील पाच वर्षांपूर्वी देखील रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, त्यावेळी काही शेतकरी आणि पोलीस पाटील यांच्यात हमरीतुमरी देखील झाली होती असे ज्ञानेश्वर दामू बडेकर या शेतकºयाने सांगितले.‘आमची यापूर्वी १४ गुंठे जमीन पाइपलाइन खाली गेली आहे, आता आणखी ८ गुंठे जमीन जाणार असेल तर आम्ही अल्पभूधारक होऊ.त्यामुळे आम्ही शेतकरी म्हणून उद्ध्वस्त होणार असल्याने आम्हाला मागील पाच वर्षांपूर्वी १४ गुंठे जमीन जाऊन केवळ ७४ हजार एवढा मोबदला मिळाला होता, त्यामुळे आम्ही आमची जमीन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी देणार नाही. त्यांना जमीन पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला चार पट जमीन अन्य ठिकाणी घेऊन द्यावी, अन्यथा आम्ही पाइपलाइनखाली झोपून राहू,पण जमीन देणार नाही.’ - इंदिरा घरत, शेतकरी महिला.