शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

बदलापूर पालिकेने अंबरनाथ एमआयडीसीत उभारले 2 लाख लीटर क्षमतेचे ऑक्सिजन स्टोरेज प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:22 IST

बदलापूर शहराला सध्या दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असून यापैकी ६ हजार लिटर ऑक्सिजन पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये, तर दोन हजार लिटर ऑक्सिजन खाजगी रुग्णालयांमध्ये वापरला जातो. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा बदलापूरमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

बदलापूर : बदलापूर शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांना ऑक्सीजन लागत असल्याने बदलापूरमध्ये मागील आठवडाभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र यावर बदलापूर पालिकेनं कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. ऑक्सीजन चा साठा करण्यासाठी स्टोरेज प्लांट उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बदलापूर पालिकेला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने हैदराबादमधील एका कंपनीच्या सहाय्याने अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन स्टोरेज उभारले असून तिथे जवळपास २ लाख लिटर ऑक्‍सिजनचा साठा करता येणार आहे.

बदलापूर शहराला सध्या दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असून यापैकी ६ हजार लिटर ऑक्सिजन पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये, तर दोन हजार लिटर ऑक्सिजन खाजगी रुग्णालयांमध्ये वापरला जातो. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा बदलापूरमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र यावर उपाय म्हणून बदलापूर पालिकेला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे ठेकेदार भरत नवगिरे यांनी हैदराबादच्या एका कंपनीसोबत मिळून अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनचा प्लँट उभारला असून तिथे तब्बल २ लाख लिटर ऑक्सीजनचा साठा करता येणार आहे.

या प्लँटची आज उल्हासनगरचे प्रांत अधिकारी जयराज कारभारी आणि बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाहणी केली. शहराला दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असला, तरी भविष्यात ही मागणी वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने बदलापूर पालिकेकडे २ लाख लिटर ऑक्‍सिजनचा साठा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यापुढे बदलापूर पालिकेला कधीही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असा विश्‍वास यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी व्यक्त केला. तसेच बदलापूर शहरातील रुग्णांना रेमडीसिविर इंजेक्शन मिळवण्यात अडचणी येत असून त्यादृष्टीनेही शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली. त्यामुळे बदलापूर शहरात आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांची कमतरता भासणार नसून रुग्णांवर अधिक चांगले उपचार करता येणार आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूर