शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 21:23 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वृत्तीमुळे शहर बदनाम होत असुन ते शहराचं दुर्दैव ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. शहरात अशा प्रकारचं काम यापुर्वीच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही. पालिकेसह राज्यात तसेच केंद्रात सत्ता असतानाही पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाला कधीही वेठीस धरलेले नाही. यंदा मात्र अच्छे दिनच्या मस्तीत पालिकेतील सत्ताधारी बेकायदेशीर कामांसाठी प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहेत, हे सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव आहे. भाजपाची केंद्रासह राज्यात सत्ता असतानाही प्रशासनाला आपल्या भोवती पिंगा घालण्यास भाग पाडणारे आ. नरेंद्र मेहता हे पालिकेला आपली स्वत:ची खाजगी मालमत्ता बनविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. 

यापूर्वी त्यांनी पालिकेचा लोगो स्वत:च्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावे करण्याचा प्रयत्न केला. त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांचा तो डाव उधळला गेला. यंदा एकहाती सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचा कारभार आपल्याभोवती केंद्रीकृत करुन आपल्या नेतृत्वाखाली श्रमिक कामगार संघटनेमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्याला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते विरोध करीत असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी मेहता यांच्याच निर्देशानुसार दालन बंद आंदोलनाचे नाटक सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशात व राज्यात पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

याउलट मेहता हे पालिकेत भ्रष्टाचार मार्गाचा अवलंब करण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांच्या या स्वार्थी व एकतर्फी कारभारामुळे शहरवायिसांत प्रचंड नाराजी पसरली असताना त्यांनी प्रशासनाविरोधात सुरु केलेल्या या असहकार आंदोलनामुळे पक्षाचेच वाभाडे काढले जात आहेत. लोकप्रतिनिधी लोकसेवक असल्याने त्यांनी लोकाभिमुख विकास साधणे आवश्यक आहे. जनतेने त्यांना एकहाती सत्ता देऊन शहराचा विकास साधण्याची संधी दिली आहे. त्या संधीचा अर्थ भ्रष्ट मार्ग होत असेल व त्यात स्वार्थीपणाचा शिरकाव केला जात असेल तर त्यात शहर व जनतेचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होईल. त्याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवावी अन्यथा जनभावना तीव्र झाल्यास त्याचा कधीही उद्रेक होईल. त्यावेळी मात्र सत्ता टिकविणे भाजपाला कठीण होईल. 

त्यामुळे भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मेहता यांनी सत्तेचा माज बाजुला सारुन प्रशासन व विरोधी पक्षांना सोबत घेऊन शहराचा विकास साधावा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.  सत्ताधाऱ्यांनी सुरु केलेले हे नाटकी आंदोलन दोन दिवसांत मागे न घेतल्यास जनतेसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या-त्या दालनाचा ताबा घेण्यास लावू. सेनेच्या लोकप्रतिनिधींचा कारभार देखील याच दालनांमधून सुरु केला जाईल, असा इशारा सरनाईक यांनी भाजपा सत्ताधाऱ्यांना दिला आहे.