शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 21:23 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वृत्तीमुळे शहर बदनाम होत असुन ते शहराचं दुर्दैव ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. शहरात अशा प्रकारचं काम यापुर्वीच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही. पालिकेसह राज्यात तसेच केंद्रात सत्ता असतानाही पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाला कधीही वेठीस धरलेले नाही. यंदा मात्र अच्छे दिनच्या मस्तीत पालिकेतील सत्ताधारी बेकायदेशीर कामांसाठी प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहेत, हे सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव आहे. भाजपाची केंद्रासह राज्यात सत्ता असतानाही प्रशासनाला आपल्या भोवती पिंगा घालण्यास भाग पाडणारे आ. नरेंद्र मेहता हे पालिकेला आपली स्वत:ची खाजगी मालमत्ता बनविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. 

यापूर्वी त्यांनी पालिकेचा लोगो स्वत:च्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावे करण्याचा प्रयत्न केला. त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांचा तो डाव उधळला गेला. यंदा एकहाती सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचा कारभार आपल्याभोवती केंद्रीकृत करुन आपल्या नेतृत्वाखाली श्रमिक कामगार संघटनेमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्याला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते विरोध करीत असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी मेहता यांच्याच निर्देशानुसार दालन बंद आंदोलनाचे नाटक सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशात व राज्यात पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

याउलट मेहता हे पालिकेत भ्रष्टाचार मार्गाचा अवलंब करण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांच्या या स्वार्थी व एकतर्फी कारभारामुळे शहरवायिसांत प्रचंड नाराजी पसरली असताना त्यांनी प्रशासनाविरोधात सुरु केलेल्या या असहकार आंदोलनामुळे पक्षाचेच वाभाडे काढले जात आहेत. लोकप्रतिनिधी लोकसेवक असल्याने त्यांनी लोकाभिमुख विकास साधणे आवश्यक आहे. जनतेने त्यांना एकहाती सत्ता देऊन शहराचा विकास साधण्याची संधी दिली आहे. त्या संधीचा अर्थ भ्रष्ट मार्ग होत असेल व त्यात स्वार्थीपणाचा शिरकाव केला जात असेल तर त्यात शहर व जनतेचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होईल. त्याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवावी अन्यथा जनभावना तीव्र झाल्यास त्याचा कधीही उद्रेक होईल. त्यावेळी मात्र सत्ता टिकविणे भाजपाला कठीण होईल. 

त्यामुळे भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मेहता यांनी सत्तेचा माज बाजुला सारुन प्रशासन व विरोधी पक्षांना सोबत घेऊन शहराचा विकास साधावा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.  सत्ताधाऱ्यांनी सुरु केलेले हे नाटकी आंदोलन दोन दिवसांत मागे न घेतल्यास जनतेसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या-त्या दालनाचा ताबा घेण्यास लावू. सेनेच्या लोकप्रतिनिधींचा कारभार देखील याच दालनांमधून सुरु केला जाईल, असा इशारा सरनाईक यांनी भाजपा सत्ताधाऱ्यांना दिला आहे.