शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा कारभार देवभरोसे?, पूर्णवेळ आयुक्त देण्याची बच्चू कडूंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 17:09 IST

उल्हासनगरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांना गेल्या वर्षी आयुक्त म्हणून डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली.

ठळक मुद्देउल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असतांना, त्याप्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोना काळात देशातील सर्वाधिक घनतेच्या शहराला प्रभारी नव्हेतर, पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आयुक्तासह उपायुक्त यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सुट्टीवर असून प्रभारी आयुक्त पदाचा पदभार भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांकडे दिला आहे. 

उल्हासनगरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांना गेल्या वर्षी आयुक्त म्हणून डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली. सुरवातीला कोविड रुग्णालय, आरोग्य केंद्र यांच्यासह आरोग्य विभागाकडे त्यांनी जातीने लक्ष दिल्याने, रुग्ण संख्या कमी झाली. दरम्यान महापालिका कारभार हाताळताना त्यांचा बहुतांश नगरसेवक, पत्रकार व नागरिक यांच्या सोबत सवांद तुटल्याचा आरोप झाला. एका वर्षांपासून पत्रकारां सोबत सवांद न साधता व भेट न दिल्याने पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार कायम ठेवला. तसेच महापालिका कारभारात सावळागोंधळ उडल्याची टीका सर्वस्तरातून होऊ लागली. महापालिकेला कॅबिन आयुक्त नव्हेतर, शहरविकासासाठी आयुक्त हवा. अशी मागणी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री यांच्याकडे सामाजिक संस्थेसह राजकीय पक्षाच्या नेते व नगरसेवकांनी केली आहे.

उल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असतांना, त्याप्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले. याच दरम्यान आयुक्त सुट्टीवर गेल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह थेट मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातल्याने, ऑक्सिजनसह इतर आरोग्य सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. महापालिकेचा कारभार सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्या पाठोपाठ महापालिका सेवेत रुजू झालेल्या आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, ते सुट्टीवर आहेत. सुदैवाने सोमवार पासून अतिरिक आयुक्त करुणा जुईकर महापालिका सेवेत रुजू झाल्याने, महापालिका कारभार रुळावर आला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आयुक्त डॉ राजा दयानिधी बाबत असंख्य तक्रारी गेल्यावर त्यांनी नगरविकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्त बदलीची लेखी मागणी केली. 

आयुक्तांची बदली थांबवते कोण?

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर सर्वस्तरातून टीका होत असून त्यांच्या बदलीची वारंवार आवाई उठविण्यात जाते. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे बदलीची मागणी केली. असे असतांना आयुक्तांची बदली थांबवते कोण? अशी चर्चा शहरात रंगली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBachhu Kaduबच्चू कडूMuncipal Corporationनगर पालिका