शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ठाणेकर मतदारराजा झाला जागरूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:44 PM

वीकेण्ड असूनही पर्यटनस्थळांकडे फिरवली पाठ : मतदानाच्या जबाबदारीची होतेय जाणीव

ठाणे : विविध उपक्रमांतून गेले काही दिवस मतदानाबाबत सुरू असलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानाच्या दिवसाआधी किंवा नंतर सुट्ट्या आल्या, तर पर्यटनासाठी बाहेर पडणारा ठाणेकर मतदारराजा या वेळी मात्र मतदानाबाबत चांगलाच जागरूक झालेला आहे. यंदा, मतदानाआधी सलग वीकेण्ड येऊनही मतदारांनी कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केलेले नाही. शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झालेला असला, तरी मतदानाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली जबाबदारीची जाणीव हेच जनजागृतीपर उपक्रमांचे यश आहे.

मतदानाबाबत वेळोवेळी निवडणूक आयोग, शासन आणि विविध संस्थांकडून उपक्रमांद्वारे जागृती केली जाते. तरीही मतदानाबाबत नागरिकांमध्ये निरुत्साह दिसतो. मतदानासाठी काही खाजगी कंपन्या, संस्था तर सुटी जाहीर करतात. मात्र, मतदार तो मतदानाचा दिवस आणि त्यालाच जोडून सुट्या घेऊन पर्यटनासाठी सहकुटुंब बाहेर पडतात, असे चित्र यापूर्वी पाहायला मिळाले आहे. यंदा, ठाणे, मुंबईत आज (सोमवारी) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस बहुतांशी मतदार हे लोणावळा, महाबळेश्वर, शिर्डी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, माथेरान अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनास जातील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, यंदा ठाणेकर मतदारांनी आपल्या मतदानाचे मूल्य ओळखलेले दिसते आहे. त्यांनी मतदानाला महत्त्व देऊन पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. ठाण्यातील बहुतांशी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे या तीन दिवसांत पर्यटनस्थळी जाण्यासाठी फारसे बुकिंग झालेले नाही. जेमतेम पाच ते सात टक्के लोकच बाहेरगावी गेलेले आहेत, असे दिसते. तर, या आधीच्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान झाले, त्यात्या जिल्ह्णात आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक ठाणे, मुंबईकर आवर्जून गेले होते. त्यांनी त्यासाठी बुकिंग केले होते, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिली.

यंदा मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती झालेली आहे. आपलं एक मत मोलाचं आहे, हे ओळखून बहुतांश मतदारांनी आपापल्या शहरात राहणं पसंत केलेलं आहे. मतदान असणाऱ्या आठवड्यात बहुतांशी नागरिक बाहेरगावी जातात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यानुसार, यंदाही ठाणेकर नागरिक पर्यटनस्थळी जातील, असा अंदाज होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे बुकिंग झालेले नाही. मतदारांनी पर्यटनाला न जाता मतदान करण्याला प्राधान्य दिलेले दिसते आहे. आमच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला असला, तरी मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह आहे, याचे समाधान वाटतं. - संतोष भोर, ट्रॅव्हल कंपनीचे प्रमुख

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणे