‘फिल्मी चक्कर’मधून आठवणी जागृत

By Admin | Updated: September 13, 2016 02:17 IST2016-09-13T02:17:02+5:302016-09-13T02:17:02+5:30

गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून

Awakening the memories through 'Film Chakra' | ‘फिल्मी चक्कर’मधून आठवणी जागृत

‘फिल्मी चक्कर’मधून आठवणी जागृत

ठाणे : गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांची दाद मिळवून गेला. ‘शोले ते थ्री इडिएट’ तसेच ‘अमिताभ ते टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपट व अभिनेत्यांची आठवण कट्ट्याच्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून करून दिली.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आता इतकी जवळ आली आहे की, जास्तीतजास्त मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली दमदार सुरुवात करावी, या हेतूने कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी ‘फिल्मी चक्कर’ ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे. त्याचा पहिला प्रयोग रविवारी पार पडला. हिंदी जुन्या व नवीन चित्रपटांतील अजरामर प्रसंगांचे सादरीकरण कट्ट्याच्या कलाकारांनी केले. त्यामध्ये दीपक मुळीक व अश्विनी जगताप यांनी ‘एअरलिफ्ट’, गणेश गायकवाड व नवनाथ कंचार यांनी ‘अग्निपथ’, स्वप्नील काळे, प्रणव दळवी व परेश दळवी यांनी ‘थ्री इडिएट’, वीणा छत्रे हिने ‘दामिनी’, नवनाथ कंचार याने शोले चित्रपटातील ‘गब्बरसिंग’, शिल्पा लाडवंते, वैभवी वंजारे व मधुरा सावंत यांनी ‘रिश्ते’, मयूरेश जोशी, नितेश कदम, शिवानी देशमुख, आरती ताथवडकर, विजय माने, प्रशांत सकपाळ, मधुरा सावंत यांनी ‘स्वर्ग’, वैभव चव्हाण व योगेश मंडलिक यांनी ‘बिल्लू बारबर’, वैभव जाधव व रोहित अहिरे यांनी शोले चित्रपटातील जयविरू, रूपेश बने याने ‘टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपटांतील भूमिका उत्तम साकारून उपस्थितांची दाद मिळवली.

Web Title: Awakening the memories through 'Film Chakra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.