शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

गरिबांच्या शिक्षणासाठी धडपड करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 00:45 IST

देशभर सायकलवरून प्रवास; १९९२ पासून उपक्रमाला केला प्रारंभ, २० हजार खेड्यांमध्ये दिले धडे

- जितेंद्र कालेकर ठाणे : सायकलवरून देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भ्रमंती करणाऱ्या आदित्यकुमार या ४९ वर्षीय अवलियाने गुरुवारी लखनौ येथून ठाणे गाठले. देशातील शेवटच्या घटकातील गरीब, अनाथ मुलांना सायकलवर जाऊन साक्षर आणि शिक्षित करण्याचे ध्येय असल्याचे आदित्यकुमार याने ‘लोकमत’ला सांगितले.उत्तर प्रदेशातील सलेमपूर (जि. फरकाबाद) या गावात वास्तव्याला असलेल्या आदित्यकुमारने विज्ञान शाखेतून (बीएससी) आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शंभरी पार केलेले आईवडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. इतर सर्व विवाहित आहेत. १९९२ पासून सायकलवरून सुरुवातीला फरकाबादमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी फिरणाºया आदित्यकुमारने राज्यभर भ्रमंती केली. पुढे अनेक ठिकाणी शिक्षणापासून गरीब मुले वंचित असल्याचे आढळल्यामुळे या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपली पदरमोडही केली. १९९२ मध्ये आॅल इंडिया सायकलगुरूचा हा प्रवास सुरू झाला. १२ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी सायकलवरून ‘आओ भारत को साक्षर बनाये’, ‘हर बेसहारा को शिक्षा मिले यही है प्रयास’ अशी घोषवाक्ये घेऊन भारतयात्रेला सुरुवात केली. उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्टÑ आदी २९ राज्यांमध्ये त्यांचा हा प्रवास झाला. या एक लाख १७ हजार किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी २० हजार गावखेड्यांमध्ये जाऊन हजारो मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेशातील सोलन सिटीमधील सहा ते सात हजार झोपडपट्टी भागातीलमुलांनाही त्यांनी प्राथमिक शिक्षण दिले. आतापर्यंत पाच लाख किलोमीटर भ्रमंती केल्याचा दावा केला आहे.आदित्यकुमार यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीची लिमका बुक आॅफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसह परदेशातील प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. देशभरातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्यापक देशव्यापी कार्य करण्यासाठी मदत करू शकतात, असेही त्यांनी आवाहन केले आहे.दोन लाख मुलांनी घेतली शाळेची प्रेरणाया प्रवासात कधी एखादा दानशूर त्यांना कपडे देतो, तर कोणी पैसे, कधीकधी तर खायलाही काही नसते. अशावेळी उपाशीपोटीही एखाद्या गावखेड्यामध्ये किंवा शहरातील रस्त्यावरच अंथरूण टाकून विश्रांती घेत असल्याचे ते सांगतात. अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केल्यामुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेतले. त्यातील काही शिक्षक तर कोणी उच्च पदस्थ अधिकारीही झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुमारे दोन लाख मुलांना त्यांनी शाळेत येण्याची प्रेरणा दिली. याच ध्येयासाठी १५ वर्षे घर सोडूनही त्यांना राहावे लागले.मुख्यमंत्री, राज्यपालांकडून गौरव या संपूर्ण कार्याची दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राज्यपाल राम नाईक यांनीही या अवलियाचा २०१४ मध्ये सत्कार केला. देशभरातील गरीब तसेच मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरीव कार्य करण्यासाठी मुंबईतील सेलिबे्रटी, दानशूर व्यक्ती किंवा बड्या राजकारण्यांनी आपल्याला दत्तक घेतल्यास एक व्यापक कार्य देशासाठी राबवता येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Educationशिक्षणthaneठाणे