शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या शिक्षणासाठी धडपड करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 00:45 IST

देशभर सायकलवरून प्रवास; १९९२ पासून उपक्रमाला केला प्रारंभ, २० हजार खेड्यांमध्ये दिले धडे

- जितेंद्र कालेकर ठाणे : सायकलवरून देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भ्रमंती करणाऱ्या आदित्यकुमार या ४९ वर्षीय अवलियाने गुरुवारी लखनौ येथून ठाणे गाठले. देशातील शेवटच्या घटकातील गरीब, अनाथ मुलांना सायकलवर जाऊन साक्षर आणि शिक्षित करण्याचे ध्येय असल्याचे आदित्यकुमार याने ‘लोकमत’ला सांगितले.उत्तर प्रदेशातील सलेमपूर (जि. फरकाबाद) या गावात वास्तव्याला असलेल्या आदित्यकुमारने विज्ञान शाखेतून (बीएससी) आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शंभरी पार केलेले आईवडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. इतर सर्व विवाहित आहेत. १९९२ पासून सायकलवरून सुरुवातीला फरकाबादमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी फिरणाºया आदित्यकुमारने राज्यभर भ्रमंती केली. पुढे अनेक ठिकाणी शिक्षणापासून गरीब मुले वंचित असल्याचे आढळल्यामुळे या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपली पदरमोडही केली. १९९२ मध्ये आॅल इंडिया सायकलगुरूचा हा प्रवास सुरू झाला. १२ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी सायकलवरून ‘आओ भारत को साक्षर बनाये’, ‘हर बेसहारा को शिक्षा मिले यही है प्रयास’ अशी घोषवाक्ये घेऊन भारतयात्रेला सुरुवात केली. उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्टÑ आदी २९ राज्यांमध्ये त्यांचा हा प्रवास झाला. या एक लाख १७ हजार किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी २० हजार गावखेड्यांमध्ये जाऊन हजारो मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेशातील सोलन सिटीमधील सहा ते सात हजार झोपडपट्टी भागातीलमुलांनाही त्यांनी प्राथमिक शिक्षण दिले. आतापर्यंत पाच लाख किलोमीटर भ्रमंती केल्याचा दावा केला आहे.आदित्यकुमार यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीची लिमका बुक आॅफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसह परदेशातील प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. देशभरातील अनाथ, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्यापक देशव्यापी कार्य करण्यासाठी मदत करू शकतात, असेही त्यांनी आवाहन केले आहे.दोन लाख मुलांनी घेतली शाळेची प्रेरणाया प्रवासात कधी एखादा दानशूर त्यांना कपडे देतो, तर कोणी पैसे, कधीकधी तर खायलाही काही नसते. अशावेळी उपाशीपोटीही एखाद्या गावखेड्यामध्ये किंवा शहरातील रस्त्यावरच अंथरूण टाकून विश्रांती घेत असल्याचे ते सांगतात. अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केल्यामुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेतले. त्यातील काही शिक्षक तर कोणी उच्च पदस्थ अधिकारीही झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुमारे दोन लाख मुलांना त्यांनी शाळेत येण्याची प्रेरणा दिली. याच ध्येयासाठी १५ वर्षे घर सोडूनही त्यांना राहावे लागले.मुख्यमंत्री, राज्यपालांकडून गौरव या संपूर्ण कार्याची दखल घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राज्यपाल राम नाईक यांनीही या अवलियाचा २०१४ मध्ये सत्कार केला. देशभरातील गरीब तसेच मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरीव कार्य करण्यासाठी मुंबईतील सेलिबे्रटी, दानशूर व्यक्ती किंवा बड्या राजकारण्यांनी आपल्याला दत्तक घेतल्यास एक व्यापक कार्य देशासाठी राबवता येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Educationशिक्षणthaneठाणे