शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

औरंगाबादच्या पोलिसाचा ठाण्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 00:08 IST

ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्दे ठाण्यातील पदपथावर आढळले आजारी अवस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोरे हे आजारी अवस्थेत २७ जुलै रोजी ठाण्यातील जांभळी नाका पदपथावर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस नाईक थविल आणि महाले यांना आढळले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सखोल चौकशीमध्ये ठाण्यात फिरस्ता म्हणून आढळलेली ही व्यक्ती औरंगाबाद पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) चालक म्हणून सध्या कार्यरत असून सध्या ते आजारपणाच्या रजेवर (सिक रजा) असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांकडून ठाणे पोलिसांना मिळाली. ठाणेनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात