शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"१४ ऑगस्टच्या आत सरकारने छोट्या व्यापाऱ्यांवरील कोविडचे निर्बंध उठवावेत, अन्यथा..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 16:37 IST

डोंबिवली ग्रेन्स अँड मर्चन्ट्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी शहरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

डोंबिवली: कोरानाच्या धर्तीवर लॉकडाऊन होऊन आता ५ महिने झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच आता शहरातील व्यापारी वर्ग देखील चिंतेत असून आर्थिक विवंचनेत आहे. त्या व्यापा-यांना राज्य शासनाने आता नियमांच्या बंधनात अडकवून आणखी समस्येत टाकू नये, १४ ऑगस्टच्या आत व्यापा-यांना असलेले निर्बंध उठवावे अन्यथा १५ ऑगस्टनंतर व्यापारी राज्य शासनाविरोधात रस्त्यावर उतरतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला.

डोंबिवली ग्रेन्स अँड मर्चन्ट्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी शहरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला डोंबिवली व्यापारी मंडळांतर्गत असलेल्या व्यापा-यांनी एकत्र येत राज्य शासनाच्या जाचक अटी, शर्थींवर नाराजी व्यक्त केली. राज्य शासन जर मद्य विक्रीसाठी प्रयत्नशील असेल तर या छोटया व्यापा-यांनी काय चूक केली आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला.

छोटे व्यापारी आहेत, त्यात किराणा, कपडा, हॉटेल यांसह अन्य किरकोळ, घाऊक विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे १ लाख कामगार यांचेही रोजगार यामुळे धोक्यात आले असून लाखो कुटुंबीयांचा प्रश्न असल्याने राज्य शासनाने आता त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले.

१ लाख कामगारांना या व्यापा-यांनी कधी पूर्ण तर कधी अर्धे वेतन दिले असून आता त्यांच्या आर्थिक क्षमता संपुष्टात आली असून यापुढे लॉकडाऊन सहन होत नसल्याची भावना व्यापा-यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता व्यापार करायला मोकळीक द्यावी, शक्य असल्यास कर, भाडे यामध्ये सूट द्यावी आणि दिलासा द्यावा. पण यापुढे वेळेचे बंधन, वारांचे बंधन नसावे असे असोसिएशनच्या वतीने व्यापारी अजित शेट्टी, दिनेश गौर आदींनी प्रातिनिधीक स्वरुपात सांगितले. 

व्यापारी एकवटलेआम्हाला कोणाचा निषेध, विरोध करायचा नाही की राजकारण करायचे नाही. आम्हाला रितसर पहिलेसारखा व्यापार, व्यवसाय करायचा आहे. सगळयांचा विकास त्यातूनच होणार असून आम्हाला रोजगाराच्या संधी देऊन अर्थकारणाला वेग द्यायचा असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. शहरातील हजारो व्यापारी एकत्र आले असून त्यांच्या संघटनांनी एकत्र येत राज्य शासनाला विनंती केली असून तरीही दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस