शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

By admin | Updated: February 3, 2017 03:14 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी ३ वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिरात झालेल्या स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी

डोंबिवली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी ३ वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिरात झालेल्या स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या प्रसिद्धीत आयोजक कमी पडल्याची खंत कार्यक्रम सादर करणाऱ्या स्थानिक संस्थांनी व्यक्त केली.संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात स्थानिक १९ संस्थांनी कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी आबासाहेब पटवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, साहित्यिक श्रीनिवास आठल्ये आणि कवी शुक्राचार्य गायकवाड उपस्थित होते. मात्र, एकही प्रेक्षक उपस्थितीत नव्हता. कार्यक्रम सादर करणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या संस्थांचे पदाधिकारीच प्रेक्षक बनले होते. याबाबत सहभागी संस्थांचे प्रतिनिधी म्हणाले की, आगरी यूथ फोरमने संमेलनाच्या पूर्व संध्येच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली नाही. आयोजकांनी शहरात किमान रिक्षा फिरवून जागृती करायला हवी होती. तसे केले असते तरी प्रेक्षक कार्यक्रमाला आले असते. (प्रतिनिधी)एकापेक्षा एक कार्यक्रमया कार्यक्रमाची ‘संपन्नाले नव्वदावे साहित्य संमेलन’ या संमेलन गीताने झाली. या गीतांवर डोंबिवलीतील कथ्थक नृत्य गुरूंनी आपले सादरीकरण केले. ‘नटश्री नृत्यालया’तर्फे सुखकर्ता दुखकर्ता ही गणेशवंदना , रसिका फडके यांनी नांदी गीत सादर केले. ‘श्री कला संस्कार’तर्फे गोंधळ, पुरस्कार नृत्य अकादमीने घुमर नृत्य, साक्षी घारे यांनी ‘पतित पावन’, मानसी नाईक यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’, शामिका केळकर यांनी ‘हृदयात गुंफुनी’ गीत सादर केले. टिळकनगर शाळेने ‘इंद्रायणी काठी,’ ओमकार स्कूल ‘मन मंदिरा’, विलास सुतावणे यांनी कथाकथन (श.ना.नवरे), नृत्य प्रिया गु्रपने ‘कृष्ण वंदे जगद्गुरू,’ यशराज कला मंचने मिलाऊ नृत्य, डॉ. वसंत भूमकर यांनी कथाकथन ‘दुख नावाची कथा’ (पु. भा. भावे कथाकथन),ओंकार स्कूलने दशावतार, सरस्वती विद्यामंदिर (रेल चाइल्ड) यांनी ‘मराठी शाळा वाचवा’ यावर पथनाट्य सादर केले. टिळकनगर विद्यामंदिराने टिपणी नृत्य, नटश्री नृत्यालयाने जोगवा सादर केला.