शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मासळी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी व्यवस्था करा; उत्तन कोळी जमात संस्थेची आयुक्तांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:55 IST

मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

शहराच्या पश्चिमेला सुमारे ५ ते ७ किलोमीटर समुद्र किनारा असुन उत्तरेला भार्इंदर खाडी तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. यातील भार्इंदर खाडी व पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे प्रमाण मोठे असुन येथील मासळी देशांतर्गत तसेच परदेशात मोठ्याप्रमाणात निर्यात केली जाते. या किनाऱ्यावर मासळीचा कचरा मोठ्याप्रमाणात निर्माण होत असल्याने तो दररोज उचलण्याऐवजी दिवसाआड अथवा दोन दिवसांनी पालिकेकडुन उचलला जात असल्याचे स्थानिक मच्छिमारांकडुन सांगितले जाते. त्यातच समुद्र व खाडीतील पाण्यासोबत त्यातील कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तसाच पडून राहिल्याने किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधी सुटते. दरम्यान स्थानिक मच्छिमार महिलांनी किनाऱ्यावर साठलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहिम सुरु केली होती. त्याची कुणकूण लागताच पालिकेने किनाऱ्यावर जमा होणारा दररोज उचलण्यास सुरुवात केली. सध्या मात्र परिस्थिती पुर्वीसारखीच झाल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांकडुन केला जात आहे. भाटेबंदर ते चौक दरम्यान एकुण ८५० मासेमारी बोटी असुन त्यात २२५ मोठ्या बोटी, ३७० जाळीवाल्या बोटी व २५५ लहान बोटींचा समावेश आहे. दिवसाला किनाऱ्यावर येणाऱ्यामासळीचे प्रमाण सुमारे १ हजार ७०० टन इतके असुन १५० बोटींद्वारे प्रत्येकी १० टनप्रमाणे १ हजार ५०० टन मासळी, १२५ जाळीवाल्या बोटींद्वारे प्रत्येकी १ टनप्रमाणे १२५ मासळी व २०० लहान बोटी प्रत्येकी ५०० किलोप्रमाणे १०० टन मासळी एका दिवसात किनाऱ्यावर आणतात. यातील सुमारे ५ टन टाकाऊ वा खराब मासळीचा कचरा किनाऱ्यावर जमा होतो. हा कचरा स्वतंत्रपणे उचलण्यासाठी पालिकेकडे व्यवस्था नसल्याने तो इतर कचऱ्यासोबतच उचलला जातो. हा कचरा परिसरातीलच घनकचरा प्रकल्पात टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या कचऱ्याच्या स्वतंत्र विल्हेवाटीची व्यवस्था मासेमारी तसेच मासळी बाजाराच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे. रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात गावपाटील कल्मेत गौऱ्या, संस्थेचे सचिव डिक्सन डिमेकर, हॅन्ड्रीक गंडोली, सिडनी पिला, संजय श्रावण्या, हिटलर गोसाल, हॅरल व गॅवियन जेलका यांचा समावेश होता. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक