शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मासळी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी व्यवस्था करा; उत्तन कोळी जमात संस्थेची आयुक्तांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:55 IST

मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

शहराच्या पश्चिमेला सुमारे ५ ते ७ किलोमीटर समुद्र किनारा असुन उत्तरेला भार्इंदर खाडी तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. यातील भार्इंदर खाडी व पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे प्रमाण मोठे असुन येथील मासळी देशांतर्गत तसेच परदेशात मोठ्याप्रमाणात निर्यात केली जाते. या किनाऱ्यावर मासळीचा कचरा मोठ्याप्रमाणात निर्माण होत असल्याने तो दररोज उचलण्याऐवजी दिवसाआड अथवा दोन दिवसांनी पालिकेकडुन उचलला जात असल्याचे स्थानिक मच्छिमारांकडुन सांगितले जाते. त्यातच समुद्र व खाडीतील पाण्यासोबत त्यातील कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तसाच पडून राहिल्याने किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधी सुटते. दरम्यान स्थानिक मच्छिमार महिलांनी किनाऱ्यावर साठलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहिम सुरु केली होती. त्याची कुणकूण लागताच पालिकेने किनाऱ्यावर जमा होणारा दररोज उचलण्यास सुरुवात केली. सध्या मात्र परिस्थिती पुर्वीसारखीच झाल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांकडुन केला जात आहे. भाटेबंदर ते चौक दरम्यान एकुण ८५० मासेमारी बोटी असुन त्यात २२५ मोठ्या बोटी, ३७० जाळीवाल्या बोटी व २५५ लहान बोटींचा समावेश आहे. दिवसाला किनाऱ्यावर येणाऱ्यामासळीचे प्रमाण सुमारे १ हजार ७०० टन इतके असुन १५० बोटींद्वारे प्रत्येकी १० टनप्रमाणे १ हजार ५०० टन मासळी, १२५ जाळीवाल्या बोटींद्वारे प्रत्येकी १ टनप्रमाणे १२५ मासळी व २०० लहान बोटी प्रत्येकी ५०० किलोप्रमाणे १०० टन मासळी एका दिवसात किनाऱ्यावर आणतात. यातील सुमारे ५ टन टाकाऊ वा खराब मासळीचा कचरा किनाऱ्यावर जमा होतो. हा कचरा स्वतंत्रपणे उचलण्यासाठी पालिकेकडे व्यवस्था नसल्याने तो इतर कचऱ्यासोबतच उचलला जातो. हा कचरा परिसरातीलच घनकचरा प्रकल्पात टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या कचऱ्याच्या स्वतंत्र विल्हेवाटीची व्यवस्था मासेमारी तसेच मासळी बाजाराच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे. रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात गावपाटील कल्मेत गौऱ्या, संस्थेचे सचिव डिक्सन डिमेकर, हॅन्ड्रीक गंडोली, सिडनी पिला, संजय श्रावण्या, हिटलर गोसाल, हॅरल व गॅवियन जेलका यांचा समावेश होता. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक