शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

मासळी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी व्यवस्था करा; उत्तन कोळी जमात संस्थेची आयुक्तांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:55 IST

मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र  व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार यांची बुधवारी भेट घेतली. 

शहराच्या पश्चिमेला सुमारे ५ ते ७ किलोमीटर समुद्र किनारा असुन उत्तरेला भार्इंदर खाडी तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. यातील भार्इंदर खाडी व पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे प्रमाण मोठे असुन येथील मासळी देशांतर्गत तसेच परदेशात मोठ्याप्रमाणात निर्यात केली जाते. या किनाऱ्यावर मासळीचा कचरा मोठ्याप्रमाणात निर्माण होत असल्याने तो दररोज उचलण्याऐवजी दिवसाआड अथवा दोन दिवसांनी पालिकेकडुन उचलला जात असल्याचे स्थानिक मच्छिमारांकडुन सांगितले जाते. त्यातच समुद्र व खाडीतील पाण्यासोबत त्यातील कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तसाच पडून राहिल्याने किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधी सुटते. दरम्यान स्थानिक मच्छिमार महिलांनी किनाऱ्यावर साठलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहिम सुरु केली होती. त्याची कुणकूण लागताच पालिकेने किनाऱ्यावर जमा होणारा दररोज उचलण्यास सुरुवात केली. सध्या मात्र परिस्थिती पुर्वीसारखीच झाल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांकडुन केला जात आहे. भाटेबंदर ते चौक दरम्यान एकुण ८५० मासेमारी बोटी असुन त्यात २२५ मोठ्या बोटी, ३७० जाळीवाल्या बोटी व २५५ लहान बोटींचा समावेश आहे. दिवसाला किनाऱ्यावर येणाऱ्यामासळीचे प्रमाण सुमारे १ हजार ७०० टन इतके असुन १५० बोटींद्वारे प्रत्येकी १० टनप्रमाणे १ हजार ५०० टन मासळी, १२५ जाळीवाल्या बोटींद्वारे प्रत्येकी १ टनप्रमाणे १२५ मासळी व २०० लहान बोटी प्रत्येकी ५०० किलोप्रमाणे १०० टन मासळी एका दिवसात किनाऱ्यावर आणतात. यातील सुमारे ५ टन टाकाऊ वा खराब मासळीचा कचरा किनाऱ्यावर जमा होतो. हा कचरा स्वतंत्रपणे उचलण्यासाठी पालिकेकडे व्यवस्था नसल्याने तो इतर कचऱ्यासोबतच उचलला जातो. हा कचरा परिसरातीलच घनकचरा प्रकल्पात टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या कचऱ्याच्या स्वतंत्र विल्हेवाटीची व्यवस्था मासेमारी तसेच मासळी बाजाराच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे. रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात गावपाटील कल्मेत गौऱ्या, संस्थेचे सचिव डिक्सन डिमेकर, हॅन्ड्रीक गंडोली, सिडनी पिला, संजय श्रावण्या, हिटलर गोसाल, हॅरल व गॅवियन जेलका यांचा समावेश होता. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक