शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:08 IST

कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे.

कल्याण - कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. चोरी झालेले हे सर्व मोबाईल आज कल्याणात आयोजित कार्यक्रमाद्वारे संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरीविरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 184 मोबाईल शोधून काढत 19. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 77 मोबाईल्स, डोंबिवली 58, उल्हासनबर 31 आणि अंबरनाथ पथकाने 4 मोबाईल शोधून काढले. 

हरवलेली किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर, उल्हासनगरचे सुनील पाटील यांच्यासह मोबाईल विरोधी पथकाचे संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Mobileमोबाइल