शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:08 IST

कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे.

कल्याण - कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. चोरी झालेले हे सर्व मोबाईल आज कल्याणात आयोजित कार्यक्रमाद्वारे संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरीविरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 184 मोबाईल शोधून काढत 19. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 77 मोबाईल्स, डोंबिवली 58, उल्हासनबर 31 आणि अंबरनाथ पथकाने 4 मोबाईल शोधून काढले. 

हरवलेली किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर, उल्हासनगरचे सुनील पाटील यांच्यासह मोबाईल विरोधी पथकाचे संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Mobileमोबाइल