शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:08 IST

कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे.

कल्याण - कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. चोरी झालेले हे सर्व मोबाईल आज कल्याणात आयोजित कार्यक्रमाद्वारे संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळात मोबाईल चोरीविरोधी पथकाची स्थापना केली. या नव्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अल्पावधीतच चोरीला गेलेले 43 आणि हरवलेले 143 असे सुमारे 22 लाख रुपये किमतीचे 184 मोबाईल शोधून काढत 19. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 77 मोबाईल्स, डोंबिवली 58, उल्हासनबर 31 आणि अंबरनाथ पथकाने 4 मोबाईल शोधून काढले. 

हरवलेली किंवा चोरीला गेलेले मोबाईल सहसा पुन्हा परत मिळत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. मात्र चोरीला गेलेले मोबाईल पोलीस शोधून काढतात आणि ते नागरिकांना परत देतात. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अंकित गोयल, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर, उल्हासनगरचे सुनील पाटील यांच्यासह मोबाईल विरोधी पथकाचे संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Mobileमोबाइल