शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयाचा मंजुरी आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:05 IST

मीरा-भाईंदर महापालिका आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचे २०१७ पासून प्रस्तावित होते.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचे २०१७ पासून प्रस्तावित होते. मात्र, त्यासाठी अद्याप मुहूर्तच सापडला नव्हता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या आयुक्तालयाचा शासन आदेश काढण्यात आला. असे असले तरी ते प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची माहितीच शासनाला देता आलेली नाही. तसेच आवश्यक इमारतीचाही थांगपत्ता नसल्याने ते आणखी किती वर्षे कागदावर राहणार, हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यांतील एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. त्यात वसई-विरारमधील सात, तर मीरा-भार्इंदरमधील सहा पोलीस ठाणी आहेत. नव्याने मीरा-भार्इंदरमध्ये दोन, तर वसई-विरारमध्ये पाच अशी सात पोलीस ठाणी मंजूर केली आहेत. २०११ मध्ये दोन्ही महापालिकांची लोकसंख्या २० लाख ४६ हजार होती. २०१९ पर्यंत तीच लोकसंख्या अंदाजे ४४ लाख ६६ हजार इतकी झाली आहे. या भागांत गुन्ह्यांचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे.मीरा-भार्इंदरमधील काशिमीरा, मीरा रोड, नयानगर, नवघर, भार्इंदर व उत्तन अशी सहा पोलीस ठाणी यात आहेत, तर खारीगाव व काशिगाव ही दोन नव्याने प्रस्तावित केली आहेत. भार्इंदर पूर्वेला फाटकापासून विमल डेअरीपर्यंतची गोडदेवकडील बाजू, तर इंद्रलोकनाक्यावरून खाडीकिनाऱ्यापर्यंतची इंद्रलोककडील बाजू या नवीन पोलीस ठाण्यात असेल. तर, सध्याच्या नवघर पोलीस ठाण्याच्या असलेल्या टाटा डोकोमो शोरूमपासून पील हाइटपर्यंतची हद्द असेल. वास्तविक गोडदेव, गोल्डन नेस्ट वा इंद्रलोक असे नाव या प्रस्तावित पोलीस ठाण्याचे हवे असताना संबंध नसणाºया खारीगावचे नाव दिल्याने गैरसोयीचे ठरणार आहे.काशिगाव या प्रस्तावित पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हाटकेशपर्यंतच्या रस्त्याची उजवी बाजू आणि काशिमीरा पोलीस ठाण्यामागील रस्त्याची डाव्या बाजूपासून थेट घोडबंदर-काजूपाड्यापर्यंत काशिगाव पोलीस ठाण्याची हद्द असेल. तर, सध्याच्या उर्वरित मुंबईच्या दिशेकडील भाग काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे. वसई-विरार हद्दीत सध्याच्या वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा आणि तुळिंज या सात पोलीस ठाण्यांसह नव्याने पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज, नायगाव अशी पाच नवीन पोलीस ठाणी मंजूर केली आहेत. त्याची अधिसूचना वेगळी काढली जाणार आहे. सध्या तरी हे आयुक्तालय निव्वळ कागदावरच आहे. त्यामुळे निवडणुका समोर ठेवून पोलीस आयुक्तालय मंजुरीचा आदेश काढल्याची चर्चा आहे.>अशी असेल आयुक्तालयाची रचनापोलीस आयुक्त कार्यालयातच आयुक्तांसह अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त (गुन्हे), उपायुक्त (मुख्यालय) यांची कार्यालये असतील. तीन उपायुक्तांची तीन पोलीस परिमंडळे असणार आहेत. परिमंडळ-१ मध्ये मीरा रोडमध्ये मीरा-भार्इंदरमधील सर्व पोलीस ठाणी येतील. परिमंडळ-२ हे वसईसाठी तर परिमंडळ-३ विरारसाठी असेल. दोन्ही जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचारी मिळून २,४८८ पदे आयुक्तालयात वर्ग करण्यासाठी मंजूर केली आहेत. तर, २,१६४ पदांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये १०२२ पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. दुसºया टप्प्यातील पदेनिर्मितीचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर पुढे कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल.पहिल्या टप्प्यातील १,०२२ पदांसाठी ९४ कोटी ६२ लाखांच्या खर्चास तर आयुक्तालय निर्माण करण्यासाठी ४३ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी आहे. आयुक्तालय निर्माण खर्चात इमारत, वाहन, नवीन पोलीस ठाणी खर्च तसेच साधनसामग्री खर्चाचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस