शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य विभागाचे कौतुक; बाळू नेटके यांच्यामुळे वाचला १३५ जणांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:51 IST

उल्हासनगर महापालिका कारभारावर नेहमीची झोळ उठत असताना, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उल्हासनगर: महापालिका आरोग्य विभाग हेल्थ केअर होरोज ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित झाला आणि यानंतर अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यामुळे दोन्ही विभागाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सतर्कतेमुळे मेहक इमारतीमधील १३५ जनाचा जीव वाचला होता. (Appreciation of Fire Department and Health Department of Ulhasnagar Municipal Corporation)

उल्हासनगर महापालिका कारभारावर नेहमीची झोळ उठत असताना, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णलाय नसतांना, शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णलाय ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच भिवंडी येथील आमंत्रण इमारतीसह रेडक्रॉस हॉस्पिटल, आयटीआय कॉलेजची इमारत, तहसिलदार कार्यालयाची इमारत, वेदांत कॉलेज इमारत, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, महापालिका शाळा ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णाच्या संख्येत वाढ होताच महापालिकेने खाजगी साई प्लॅटिनियम भाडेतत्वावर घेऊन शेकडो कोरोना रुग्णांना जीवदान दिले. अपुरा डॉक्टर वर्ग असतांना विभागाने चांगले काम केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे व वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. विभागाच्या कामाची दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाला हेल्थ केअर हिरोज ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाच्या पाठोपाठ अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन दलाचे प्रमुख पंकज पवार, स्टेशन मास्टर संदीप आसेकर व राजेंद्र राजन याना स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यानंतर, दोन्ही विभागाच्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. २०१९ मध्ये कॅम्प नं-३ लिंक रोडवरील पाच मजल्याच्या मेहक इमारतीचे दरवाजे सकाळी ८ वाजण्याच्यादरम्यान उघडत नसल्याने, नागरिकांनी अग्निशमन दल विभागाला माहिती दिली. विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील २५ कुटुंबातील १३५ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच इमारत केंव्हाही पडण्याची शक्यता व्यक्त करून राहिवाशी नागरिक व राजकीय दबाव असताना इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला. दुसऱ्या दिवशी सकाळी इमारत कोसळली. अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांच्यासह सहकाऱ्यांमुळे तब्बल १३५ जणांचे जीव वाचले होते. 

महापालिका विभागाचे सर्वत्र कौतुक अग्निशमन दलाचे राष्ट्रपती शौर्य पदक विजेते अधिकारी बाळू नेटके, पंकज पवार, संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा स्वातंत्र दिनी महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शहरातही त्यांचे कौतुक व सत्कार होत आहे, तसेच आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे यांचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरFire Brigadeअग्निशमन दल