शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:11 IST

धरणांतील पाणीसाठा होतोय कमी : मंगळवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी; ठाणे शहरात सखल भागांत साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुलै संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाºयानंतर मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे ठाणे शहरांत घोडबंदर रोडसह सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.ठाणे शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत २८ मिमी. पाऊस पडला. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटनेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाइपलाइन लिकेज झाल्याची घटना घडली. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या. जिल्ह्यात ९६.५० मिमी. पाऊस गेल्या २४ तासांत पडला. ठाणेनंतर भिवंडीत सर्वाधिक २२ मिमी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी १३.७९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यात ठाणे शहरात रात्री पाचपाखाडीत सोसायटीवर झाड पडले. यामुळे येथील रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. यात झाडामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे व दोन दुकानांचे नुकसान झाले. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू झाल्याने झाड हटवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.या दरम्यान शहरात मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली. तर, वसंत विहारजवळील आनंद दिघे जिद्द शाळेजवळील एक झाड पडले. वर्तकनगरला झाडाच्या फांद्या पडल्या. याप्रमाणेच जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरी भागासह ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाले.धरणांना पावसाची प्रतीक्षाच्ठाणे जिल्ह्यातील धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची चिंता लागून आहे.च्आॅगस्ट आणि सप्टेंबर या उरलेल्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.