शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:11 IST

धरणांतील पाणीसाठा होतोय कमी : मंगळवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी; ठाणे शहरात सखल भागांत साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुलै संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाºयानंतर मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे ठाणे शहरांत घोडबंदर रोडसह सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.ठाणे शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत २८ मिमी. पाऊस पडला. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटनेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाइपलाइन लिकेज झाल्याची घटना घडली. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या. जिल्ह्यात ९६.५० मिमी. पाऊस गेल्या २४ तासांत पडला. ठाणेनंतर भिवंडीत सर्वाधिक २२ मिमी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी १३.७९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यात ठाणे शहरात रात्री पाचपाखाडीत सोसायटीवर झाड पडले. यामुळे येथील रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. यात झाडामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे व दोन दुकानांचे नुकसान झाले. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू झाल्याने झाड हटवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.या दरम्यान शहरात मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली. तर, वसंत विहारजवळील आनंद दिघे जिद्द शाळेजवळील एक झाड पडले. वर्तकनगरला झाडाच्या फांद्या पडल्या. याप्रमाणेच जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरी भागासह ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाले.धरणांना पावसाची प्रतीक्षाच्ठाणे जिल्ह्यातील धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची चिंता लागून आहे.च्आॅगस्ट आणि सप्टेंबर या उरलेल्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.