शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

भाजपाचा शिवसेनेला आणखी एक धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:54 AM

मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत

मीरा रोड : मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणल्याने वादंग निर्माण झाला आहे. त्यातच भाजपाने त्याच महासभेत नवघर गावामागे दफनभूमीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव आणला आहे. यावरुन स्थानिक चारही शिवसेना नगरसेवकांसह रहिवाशांनी भाजपाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.८ डिसेंबरच्या महासभेत महापौर डिम्पल मेहता यांनी नवघर गावामागील आरक्षण क्र. १२२ मधील क व ड ची जागा ही दफनभूमीसाठी बोहरा समाजास देण्याचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेसह स्थानिक ग्रामस्थ व रहिवाशांचा सुरवातीपासूनच यास विरोध आहे. आधीच या ठिकाणची स्मशानभुमीची जागा अपुरी पडत आहे. भार्इंदर पूर्व भागात नवघर, गोडदेव आदी परिसरात त्या समाजाची नाममात्र वस्ती असताना त्या समाजाला दफनभूमीची आवश्यकता का, असा प्रश्न रहिवाशांसह शिवसेनेकडून आधीपासूनच केला जात होता. जेथे निकड आहे त्या भार्इंदर पश्चिम किंवा मीरा रोड भागात दफनभूमी विकसित करावी, असा सूर त्यांनी लावला होता. त्यामुळे या आधी देखील दोन वेळा प्रयत्न करण्यात आला, पण विरोधामुळे हा मुद्दा बारगळला होता.पालिका निवडणुकीत ६१ जागा भाजपाने जिंकल्या असल्या, तरी नवघर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत मिळाल्याने पालिकेत भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला व पर्यायाने आमदार प्रताप सरनाईक यांना टार्गेट केले आहे. शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबियांशी संबंधित बांधकाम नोटीस न देताच जमीनदोस्त केल्यानंतर महासभेत सरनाईक यांच्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याने काशिमीरा येथे आकार घेत असलेले शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपाने आणला आहे. उध्दव ठाकरे यांनी त्याचे भूमिपूजन केले होते. सेनेला नाट्यगृहावरुन डिवचणाºया भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वाने त्याच महासभेत शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या नवघर गावामागे दफनभूमी विकसित करण्यासाठी ती जागा बोहरा समाजाला देण्याचा प्रस्ताव आणला.प्रभागातील शिवसेनेचे प्रवीण पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील व अनंत शिर्के या चारही नगरसेवकांनी पत्रक काढून भाजपाचा निषेध केला आहे. भाजपाच्या या तेढ निर्माण करणाºया कुटील डावाविरुध्द आंदोलनासाठी ग्रामस्थ व रहिवाशांनी तयार रहावे, असे आवाहनही केले आहे. भार्इंदर पूर्व परिसरात बोहरा समाजाची लोकवस्ती नसताना भाजपाने राजकीय फायद्यासाठी तसेच नागरिकांनी सेनेला मतदान केल्याने त्याचा राग काढण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना