शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाच कोटींच्या ट्रामाडोलप्रकरणी आणखी एकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2019 23:05 IST

इसिससारख्या इतिरेकी संघटनांकडून ‘फायटर ड्रग्ज’म्हणून मोठया प्रमाणात उपयोगात आणले जाणाऱ्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे‘इसिस’कडून केला जातो वापरखून प्रकरणातील आरोपीनेच दिली भावाची ‘खबर’ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

ठाणे : भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ या ‘फायटर ड्रग्ज’च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे. त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटनांकडून ट्रामाडोलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.इसिसमध्ये ‘फायटर ड्रग्ज’ अशी ओळख असलेल्या ट्रामाडोलची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाºया संतोष पांडे याच्यासह चौघांना १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांच्या (आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पाच कोटींच्या किमतीच्या) नऊ हजार ६३० स्ट्रीप्समधील ट्रामाडोलसह मयूर मेहता, रोमेल वाज, संतोष पांडे आणि दीपक कोठारी या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अटक केली होती. याच प्रकरणाच्या चौकशीतून निलेश शुक्ला याचे नाव समोर आले. शुक्ला याने आॅगस्ट २०१८ मध्ये पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून अविनाश बारी याचा खून केला होता. याच खून प्रकरणात त्याला मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडीतून म्हणजे कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने या प्रकरणामध्ये त्याचाच भाऊ संजय शुक्ला याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ३१ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश १ जानेवारी रोजी दिले. संजयचा या प्रकरणामध्ये कितपत सहभाग आहे, त्याने हे ट्रामाडोल कोणाच्या परवानगीने मुंबई परिसरात विक्रीसाठी आणले, याचाही आता शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलेकाय आहे ट्रामाडोल?ट्रामाडोलचा जखमेची तीव्रता कमी करण्यासाठीही वापर होतो. वेदनाशामक असल्यामुळे ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटना त्याचा वापर गोळीबार किंवा बॉम्बस्फोटांमध्ये जखमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात करतात. याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये एप्रिल २०१८ मध्ये त्यावर बंदी घातलेली आहे. भारतासह अनेक देशांनीही त्यावर बंदी घातली आहे..

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीISISइसिस