शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:39 IST

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे.

नारायण जाधव ठाणे : वाहतूककोंडीसह पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एका टाउनशिपला शासनाने १२ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिली आहे. कल्याण-शीळफाटा मार्गावर हे नवे शहर सुमारे १३३ एकरावर उभे राहणार आहे. याच भागात सध्या पलावा सिटी उभारण्यात आली असून याच सिटीच्या पुढे ही नवी सिटी घारीवली, उसरघर, सागांव येथील जमिनीवर उभी राहणार आहे. निवासी इमारती, वाणिज्यिक संकुले असलेली ही एकात्मिक नगर वसाहत असेल. या नव्या शहरात वास्तव्याला येणाऱ्यांच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सरकारने बिल्डरवर सोपवली आहे.

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे. कल्याण-अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखड्यातील तरतुदीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-शीळ या मार्गावरच ही वसाहत उभी राहणार आहे.

सध्या या मार्गावर अनेक छोट्यामोठ्या वसाहतींसह लोढा समूहाची पलावा सिटी उभी आहे. डोंबिवलीचे विस्तारीत क्षेत्र याच मार्गावर आहे. शिवाय नवी मुंबई-ठाणे-पनवेल या महापालिकांना संपर्क साधणारा कल्याण-शीळफाटा हा रस्ता जुन्या मुंबई -पुणे महामार्गाद्वारे सांधणारा एकमेव दुवा आहे. या मार्गांवरून सध्या जेएनपीटीसह तळोजा आणि नवी मुंबईची टीटीसी औद्योगिक वसाहतीतून दररोज बाहेर पडणाºया कंटेनर, अवजडवाहनांसह कामगारांची ने-आण करणाºया बस, टॅक्सी, कारसह केडीएमटी, एनएमएमटीच्या बस याच मार्गावर धावतात. परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होती. त्यामुळे या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच आता मोठ्या समूहाची टाऊनशिप उभी राहणार असल्याने येथील जागांचे भाव वाढणार आहेत.

समस्यांत पडणार भरशीळफाटा परिसरात सध्या वेगाने लोकसंख्या वाढत असून या परिसरात वाहतूककोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यात नव्या वसाहतींमुळे भर पडणार आहे. सध्या शीळफाटा येथे पिक अवरला लोकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागते. नवी टाऊनशीप उभी राहिल्यावर या भागात किती वाहतूककोंडी होईल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चर्चा आहे.

या अटींंवर दिली परवानगीनव्या एकात्मिक वसाहतीस परवानगी देतांना शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यात संबधित बिल्डरने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची मोजणी करायची आहे. परिसरातील इतर भूखंडधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ९ ते १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याचा पुनर्वापर करणे यासह वसाहतीत राहायला येणाºया रहिवासी, वाणिज्यिक संकुलांसाठी पाणी आणि विजेची सोय स्वखर्चाने करायची आहे.