शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:39 IST

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे.

नारायण जाधव ठाणे : वाहतूककोंडीसह पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एका टाउनशिपला शासनाने १२ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिली आहे. कल्याण-शीळफाटा मार्गावर हे नवे शहर सुमारे १३३ एकरावर उभे राहणार आहे. याच भागात सध्या पलावा सिटी उभारण्यात आली असून याच सिटीच्या पुढे ही नवी सिटी घारीवली, उसरघर, सागांव येथील जमिनीवर उभी राहणार आहे. निवासी इमारती, वाणिज्यिक संकुले असलेली ही एकात्मिक नगर वसाहत असेल. या नव्या शहरात वास्तव्याला येणाऱ्यांच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सरकारने बिल्डरवर सोपवली आहे.

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे. कल्याण-अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखड्यातील तरतुदीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-शीळ या मार्गावरच ही वसाहत उभी राहणार आहे.

सध्या या मार्गावर अनेक छोट्यामोठ्या वसाहतींसह लोढा समूहाची पलावा सिटी उभी आहे. डोंबिवलीचे विस्तारीत क्षेत्र याच मार्गावर आहे. शिवाय नवी मुंबई-ठाणे-पनवेल या महापालिकांना संपर्क साधणारा कल्याण-शीळफाटा हा रस्ता जुन्या मुंबई -पुणे महामार्गाद्वारे सांधणारा एकमेव दुवा आहे. या मार्गांवरून सध्या जेएनपीटीसह तळोजा आणि नवी मुंबईची टीटीसी औद्योगिक वसाहतीतून दररोज बाहेर पडणाºया कंटेनर, अवजडवाहनांसह कामगारांची ने-आण करणाºया बस, टॅक्सी, कारसह केडीएमटी, एनएमएमटीच्या बस याच मार्गावर धावतात. परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होती. त्यामुळे या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच आता मोठ्या समूहाची टाऊनशिप उभी राहणार असल्याने येथील जागांचे भाव वाढणार आहेत.

समस्यांत पडणार भरशीळफाटा परिसरात सध्या वेगाने लोकसंख्या वाढत असून या परिसरात वाहतूककोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यात नव्या वसाहतींमुळे भर पडणार आहे. सध्या शीळफाटा येथे पिक अवरला लोकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागते. नवी टाऊनशीप उभी राहिल्यावर या भागात किती वाहतूककोंडी होईल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चर्चा आहे.

या अटींंवर दिली परवानगीनव्या एकात्मिक वसाहतीस परवानगी देतांना शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यात संबधित बिल्डरने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची मोजणी करायची आहे. परिसरातील इतर भूखंडधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ९ ते १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याचा पुनर्वापर करणे यासह वसाहतीत राहायला येणाºया रहिवासी, वाणिज्यिक संकुलांसाठी पाणी आणि विजेची सोय स्वखर्चाने करायची आहे.