शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

ठाण्यातील सिद्धी गुप्ताच्या नातेवाईकांना महावितरणकडून अखेर पाच लाखांची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:33 IST

सिद्दी गुप्ताचा वीजेच्या धक्क्यामुळे रविवारी मृत्यु ओढवला. शिवसेनेसह परिसरातील रहिवाशांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर तिच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याचे महावितरणच्या अधिका-यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवरही होणार निलंबनाची कारवाईविजेच्या धक्क्याने रविवारी झाला होता मृत्युलोकमत इफेक्ट

ठाणे : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे लोकमान्यनगर येथील मृत पावलेल्या सिद्दी गुप्ता (७) या मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याबरोबरच यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या ठाण्यातील अधिका-यांनी दिले. ओवळा माजीवडयाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.टेमकर चाळीतील तिसरी मध्ये शिकणा-या सिद्धी हिला रविवारी महावितरणच्या उघडया वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का बसला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु ओढवला. ‘महावितरणच्या हलगर्जीमुळे ठाण्यामध्ये चिमुकलीचा मृत्यु’ या मथळयाखाली ‘लोकमत’ हॅलो ठाणेच्या ४ एप्रिलच्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, बुधवारी महावितरणच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरणच्या सावरकरनगर येथील कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच या मुलीच्या पालकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची तसेच संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत महावितरणचे ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता संतोष वहाणे आणि वागळे इस्टेट विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चौधरी यांनी सिद्धीच्या पालकांना एक महिन्याच्या आत पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच संबंधित दोषी कर्मचारी अधिका-यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्यनगर परिसरातील उघडया अवस्थेतील वीज वाहिन्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारे जुने गंजलेले विद्युत पोल्स हटविण्यात यावेत, अशी मागणीही सरनाईक यांनी केलेली आहे. या मागणीलाही महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शॉक प्रूफ विद्युत बॉक्स या परिसरात बसवून जुने विद्युत पोल हटवावेत. तसेच महापालिकेकडे मागणी करून उपलब्ध जागेत भूमिगत केबल सह चांगल्या प्रतीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, झोपडयांवरुन गेलेल्या विद्युत वाहिन्या दुर्घटना होणार नाहीत, अशा ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात, नवीन सदोष वीज मीटरची तपासणी करून मगच योग्य वीज बिले नागरिकांना पाठवावीत, आदी मागण्यांचेही निवेदन सरनाईक यांनी यावेळी दिले. यातील बहुतांश मागण्याही महावितरणने तात्काळ मान्य केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.यावेळी युवसेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक, दिलीप बारटक्के, नगरसेविका आशा डोंगरे, कांचन चिंदरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नलावडे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपशहर संघटक भाई खाडे, युवसेना समन्वयक संदिप डोंगरे तसेच शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDeathमृत्यू