शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

ठाण्यातील सिद्धी गुप्ताच्या नातेवाईकांना महावितरणकडून अखेर पाच लाखांची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:33 IST

सिद्दी गुप्ताचा वीजेच्या धक्क्यामुळे रविवारी मृत्यु ओढवला. शिवसेनेसह परिसरातील रहिवाशांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर तिच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याचे महावितरणच्या अधिका-यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवरही होणार निलंबनाची कारवाईविजेच्या धक्क्याने रविवारी झाला होता मृत्युलोकमत इफेक्ट

ठाणे : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे लोकमान्यनगर येथील मृत पावलेल्या सिद्दी गुप्ता (७) या मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याबरोबरच यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या ठाण्यातील अधिका-यांनी दिले. ओवळा माजीवडयाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.टेमकर चाळीतील तिसरी मध्ये शिकणा-या सिद्धी हिला रविवारी महावितरणच्या उघडया वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का बसला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु ओढवला. ‘महावितरणच्या हलगर्जीमुळे ठाण्यामध्ये चिमुकलीचा मृत्यु’ या मथळयाखाली ‘लोकमत’ हॅलो ठाणेच्या ४ एप्रिलच्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, बुधवारी महावितरणच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरणच्या सावरकरनगर येथील कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच या मुलीच्या पालकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची तसेच संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत महावितरणचे ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता संतोष वहाणे आणि वागळे इस्टेट विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चौधरी यांनी सिद्धीच्या पालकांना एक महिन्याच्या आत पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच संबंधित दोषी कर्मचारी अधिका-यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्यनगर परिसरातील उघडया अवस्थेतील वीज वाहिन्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारे जुने गंजलेले विद्युत पोल्स हटविण्यात यावेत, अशी मागणीही सरनाईक यांनी केलेली आहे. या मागणीलाही महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शॉक प्रूफ विद्युत बॉक्स या परिसरात बसवून जुने विद्युत पोल हटवावेत. तसेच महापालिकेकडे मागणी करून उपलब्ध जागेत भूमिगत केबल सह चांगल्या प्रतीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, झोपडयांवरुन गेलेल्या विद्युत वाहिन्या दुर्घटना होणार नाहीत, अशा ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात, नवीन सदोष वीज मीटरची तपासणी करून मगच योग्य वीज बिले नागरिकांना पाठवावीत, आदी मागण्यांचेही निवेदन सरनाईक यांनी यावेळी दिले. यातील बहुतांश मागण्याही महावितरणने तात्काळ मान्य केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.यावेळी युवसेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक, दिलीप बारटक्के, नगरसेविका आशा डोंगरे, कांचन चिंदरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नलावडे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपशहर संघटक भाई खाडे, युवसेना समन्वयक संदिप डोंगरे तसेच शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDeathमृत्यू