शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mahalaxmi Express : रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:31 IST

काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

- पंकज पाटीलबदलापूर : तब्बल १४ तासांहून अधिक काळ महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अंबरनाथ ते वांगणी या रेल्वेमार्गावर पाणी साचल्याची पूर्वकल्पना असतानाही रेल्वेस्थानकात तासभर उभी केलेली गाडी पुढे का सोडण्यात आली, असा सवाल सुटका झालेले प्रवासी करत होते. गाडीत खानपानाची व्यवस्था नसल्याने त्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी अत्यंत कमी कालावधीत एनडीआरएफच्या जवानांनी पुरातून सुखरूप सुटका केल्याने त्यांची आणि मदतीला धावून आलेल्या स्थानिकांची प्रवाशांनी तोंडभरून स्तुती केली.रेल्वे डब्यांत अडकलेल्या प्रवाशांनी सर्वप्रथम आपल्या नातलगांना फोन केले. त्यानंतर, काहींनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलीस यांना फोन केले. काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वट करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश न आल्याने प्रवासी चिडले.एनडीआरएफची टीम पोहोचल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला. दोन हेलिकॉप्टर त्या परिसरात घिरट्या घालू लागल्याने मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांना जाणवले. सुटका झालेले प्रवासी रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते. एनडीआरएफ व स्थानिकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.रुळांवर पाणी साचले आहे, याची कल्पना असतानाही रेल्वेने गाडी पुढे सोडली, हा प्रचंड हलगर्जीपणा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही केले नाही. गाडीत खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने हाल झाले. रेल्वेचे बेजबाबदार वर्तन निषेधार्ह आहे.- संदीप शिंदे, परळ, मुंबईकोल्हापूरला दोनदिवसीय साहित्य संमेलन असल्याने मी व माझे सहकारी महालक्ष्मीने निघालो होतो. मात्र, ही गाडी कल्याणनंतर संथगतीने जात होती. अंबरनाथ स्थानकाजवळ गाडी दोन तास थांबवण्यात आली होती. गाडी पुढे जाऊ शकत नाही, याची कल्पना होती, तर ती पुढे सोडून शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे काम रेल्वेने का केले?- प्रतीक धनावडे, ठाणेकोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मी जात होते. सुरुवातीपासूनच गाडी पुढे जाणार की नाही, अशी परिस्थिती होती. रात्रीच्या अंधारात गाडी अनेक ठिकाणी थांबत होती. अंबरनाथ स्थानकातही दोन तास गाडी थांबली. मात्र, बदलापूर स्थानक सोडल्यावर गाडी जी थांबली, ती पुढे सरकलीच नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे, त्या स्थितीतच राहावे लागले. गाडी अडकल्यावर रेल्वेने सुरुवातीला मदत पाठवणे गरजेचे होते. मात्र, कोणतीच मदत रेल्वेकडून आली नाही. एनडीआरएफच्या टीममुळे आम्ही आज सुखरूप आहोत.- रुचा घायवट, टिटवाळारेल्वेला प्रवाशांची कोणतीच चिंता नाही, हे सिद्ध झाले आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लावून रेल्वेने आपली बेपर्वाई दाखवली आहे. गाडीच्या आत पाणी येत असतानाही कोणतीच मदत आली नाही. पाण्यासोबत डब्यात साप आल्याने सर्वांच्या मनात भीती बसली. अवघड परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली. या प्रकारानंतर किमान रेल्वेने प्रवाशांच्या जीवितासोबत खेळू नये.- आशा भरोडे, मुंबईमुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी आम्ही डोंबिवलीला आलो होतो. रात्रीची गाडी पकडल्यावर रात्रभर गाडीत आराम करून सकाळी कोल्हापूरला उतरणार होतो. मात्र, गाडीच पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने आमचा जीव टांगणीला लागला होता. रात्र अत्यंत वाईट गेली. कोणतीच मदत आम्हाला रेल्वेकडून मिळाली नाही. सकाळी स्थानिकांकडून आणि बचाव पथकाकडूनच मदत मिळाली.- सुरेश जोशी, मिरजआधीच आजारपण, दम्याचा प्रचंड त्रास, त्यात गाडी अडकल्याने जीव टांगणीला लागला होता. आता जीव जातोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. बचाव पथकाने बाहेर काढले. मात्र, बाहेर काढल्यानंतर डोंगर ओलांडून गावात जाण्याची ताकद नव्हती. अर्ध्यावरच बसून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामस्थांनी मदत केल्याने खाली सुखरूप आले.- शोभा पवार, कोल्हापूर

टॅग्स :Mahalaxmi Expressमहालक्ष्मी एक्सप्रेस