शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

२२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:38 IST

ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. पुनर्विकासाचा हा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) सादर केला असून यामुळे येथील २२८० झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याची चिन्हे आहेत.ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. मुंबई शहरापर्यंत मर्यादित असलेल्या प्राधिकरणामध्ये ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश करून त्यासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू केले. या कार्यालयामार्फत शहरात झोपड्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जात असून आता आनंदनगरमधील झोपड्यांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. त्यामुळे ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रि या उरकून विकासकाने योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्याची प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर त्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रि या उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरला असल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे.४२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंडआनंदनगर परिसरातील ४२ हजार चौरस मीटर शासकीय जागेवर सुमारे २२८० झोपड्या आहेत. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे. यासाठी रहिवाशांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत.यापैकी आनंदनगर नागरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपु योजनेसाठी १८०० म्हणजेच ८५ टक्के नागरिकांची संमती मिळवली आहे. तसेच झोपडपट्टीधारकांच्या कुटुंबांची आणि त्यांच्या घराची माहिती नोंद करण्याचे कामही संस्थेने पूर्ण केले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे.ठाणे शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Homeघर