शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

२२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:38 IST

ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. पुनर्विकासाचा हा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) सादर केला असून यामुळे येथील २२८० झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याची चिन्हे आहेत.ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. मुंबई शहरापर्यंत मर्यादित असलेल्या प्राधिकरणामध्ये ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश करून त्यासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू केले. या कार्यालयामार्फत शहरात झोपड्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जात असून आता आनंदनगरमधील झोपड्यांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. त्यामुळे ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रि या उरकून विकासकाने योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्याची प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर त्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रि या उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरला असल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे.४२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंडआनंदनगर परिसरातील ४२ हजार चौरस मीटर शासकीय जागेवर सुमारे २२८० झोपड्या आहेत. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे. यासाठी रहिवाशांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत.यापैकी आनंदनगर नागरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपु योजनेसाठी १८०० म्हणजेच ८५ टक्के नागरिकांची संमती मिळवली आहे. तसेच झोपडपट्टीधारकांच्या कुटुंबांची आणि त्यांच्या घराची माहिती नोंद करण्याचे कामही संस्थेने पूर्ण केले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे.ठाणे शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Homeघर