शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

२२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:38 IST

ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. पुनर्विकासाचा हा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) सादर केला असून यामुळे येथील २२८० झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याची चिन्हे आहेत.ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. मुंबई शहरापर्यंत मर्यादित असलेल्या प्राधिकरणामध्ये ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश करून त्यासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू केले. या कार्यालयामार्फत शहरात झोपड्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जात असून आता आनंदनगरमधील झोपड्यांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. त्यामुळे ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रि या उरकून विकासकाने योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्याची प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर त्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रि या उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरला असल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे.४२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंडआनंदनगर परिसरातील ४२ हजार चौरस मीटर शासकीय जागेवर सुमारे २२८० झोपड्या आहेत. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे. यासाठी रहिवाशांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत.यापैकी आनंदनगर नागरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपु योजनेसाठी १८०० म्हणजेच ८५ टक्के नागरिकांची संमती मिळवली आहे. तसेच झोपडपट्टीधारकांच्या कुटुंबांची आणि त्यांच्या घराची माहिती नोंद करण्याचे कामही संस्थेने पूर्ण केले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे.ठाणे शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Homeघर