शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अण्णाजी ऐवजी 'अंजली' नावाने शिक्षकाला नियुक्ती आदेश; दुरूस्तीसाठीही अडवणूक

By सुरेश लोखंडे | Updated: June 22, 2019 21:41 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणही पूर्ण केले

ठळक मुद्देविदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्ठाने शिक्षणशिक्षकाचे नाव ‘अंजली’ असे महिलेचे नाव नियुक्ती आदेशातत्यात प्रशासन त्यांची चौबाजुने आडवणूक

सुरेश लोखंडेठाणे : विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्ठाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे या ंशिक्षकालाठाणेजिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र तत्काली मिळालेल्या शिक्षक नियुक्ती आदेशावर अण्णाजी ऐवजी ‘अंजली’ असे चुकीचे लिहिले गेले. नऊ वर्षांपासून अद्यापपर्यंतही नावातील दुरूस्ती करण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखवले नाही. प्रशासनाच्या या चुकीमुळे शिक्षकास नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची गंभीरबाब उघडकीस आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणही पूर्ण केले. पण तत्काली या शिक्षकास ठाणे जिल्हा परिषदेने दिलेल्या नियुक्त आदेशावर त्यांचे नाव अण्णाजी ऐवजी अंजली असे नमुद केले. या चुकीच्या नावावर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही त्यांना हजर करून घेतले. त्यानंतर नावात दुरूस्ती करण्याच्या कामासाठी कुळसेंगे तब्बल नऊ वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मुख्यालयात फेऱ्या मारत आहेत. नियुक्ती आदेशातील चुकीच्या नावा ऐवेजी ‘अण्णाजी’ अशी दुरूस्ती करण्याऐवजी चौकशी लावून वेतन थांबवण्याची भीती प्रशासनाकडून दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. या मनमानीमुळे कुळसेंगे यांना तीव्र मनस्तापास तोंड द्यावे लागत आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या झरी धांगडपाडा ता. तलासरी येथे कुळसेंगे शिक्षक पदी कार्यरत आहे.तत्काली ठाणे जिल्हह्यातच तलासरी तालुका समाविष्ठ होता. जिल्हा विभाजनानंतर पालघर जिल्ह्यात या तालुक्याचा समावेश झाला. पण नावातील दुरूस्तीसाठी सतत नऊ वर्षांपासून फेºया मारणाºया कुळसेंगे यांना आता जिल्हा विभाजनामुळे ठाणे जिल्हा परिषदेतून मुळे नियुक्ती आदेशातील दुरूस्तील विलंब होत आहे. अंजली ऐवजी मी ‘अण्णाजी’ असल्याचे सर्व कागदपत्रे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या मुळच्या गावच्या ग्राम पंचायतींने देखील शिफारस केली आहे. मात्र शालेय कागदपत्रे, डिएड प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्र सुपूर्द करूनही कुळसेंगे यांच्या नावात दुरूस्ती करून देण्यास प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मनमानी टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या सदस्या वृषाली विलास शेवळे यांनी सर्वसाधारण सभेच्या निदर्शनात आणून दिले आहे.गडचिरोलीच्या नक्षली भागातील हा शिक्षक आपल्याकडे स्वाभिमानाने जीवन जगत आहे. चुकी नसतानाही या शिक्षकाचे नाव ‘अंजली’ असे महिलेचे नाव नियुक्ती आदेशात नमुद केले आहे. त्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात प्रशासन त्यांची चौबाजुने आडवणूक करीत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे व संतापातून या शिक्षकाचे बरेवाईट होऊ शकते, मनस्तापातून ते नक्षलग्रस्त होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, आदी मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही झाली आहे. मात्र अजूनही कुळसेंगे, यांच्या नियुक्ती आदेशातून चूक दुरूस्त करून अण्णाजी असे करून मिळालेले नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मनमानी व अनागोदी कारभारा संदर्भात तर्कवितर्क काढले जात असून जिल्हा परिषद प्रशासन आता कुळेसेंगे यांना काय न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक