शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

दोन वर्षात अमृत योजना कार्यन्वित होणार; महापालिका अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:35 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २७ गावांसाठी १९४ कोटी रुपयांचा निधी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. त्यासाठी पाण्याच्या उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसमवेत गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा शनिवारी घेतला.

त्या योजनेंतर्गत गावांमध्ये तब्बल २८ पाण्याच्या टाक्या आणि १४ सब टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जागांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी,खाजगी विकासक, जागामालक यांचा आमदार पाटील यांनी समन्वय घालण्याचे आश्वासन।दिले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी  इतर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला योग्यते सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे. तर खाजगी विकासक,जागामालकांनी देखील योग्य सहकार्य केडीएमसी अधिकाऱ्यांना केले जाईल असे पाटील यांना सांगितले.

   कल्याण ग्रामीण मधील आजदे, सोनारपाडा,डोंबिवली एमआयडीसी, भोपर-देसलेपाडा, उसरघर, कोळे आणि कटाई या गावांमध्ये जागेची पाहणी करत  योजनेचा आढावा घेतला आहे.तर उर्वरीत गावांमध्ये पाहणी दौरा देखील लवकरच केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

 येत्या दोन वर्षात २७ गावांमध्ये ही योजना कार्यन्वित होणार असून कल्याण डोंबिवली मधील २७ गावांना या योजनेअंतर्गत १०५ एमएलडी पाणी मिळणार आहे.त्यामुळे २७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.असे केडीएमसीचे अधिकारी राजू पाठक आणि विजय पाटील यांनी सांगितले आहे. जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यन्वित होत नाही तो पर्यंत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करता येईल का ? याचा सुद्धा आढावा घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या आढावा दौऱ्यावेळी पाटील यांच्यासह केडीएमसीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  राजीव पाठक, विजय पाटील,मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, मनसे नगरसेवक प्रभाकर जाधव, केडीएमटी सद्यस प्रसाद माळी, मनसे उपविभाग अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका