शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

दोन वर्षात अमृत योजना कार्यन्वित होणार; महापालिका अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:35 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २७ गावांसाठी १९४ कोटी रुपयांचा निधी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. त्यासाठी पाण्याच्या उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसमवेत गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा शनिवारी घेतला.

त्या योजनेंतर्गत गावांमध्ये तब्बल २८ पाण्याच्या टाक्या आणि १४ सब टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जागांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी,खाजगी विकासक, जागामालक यांचा आमदार पाटील यांनी समन्वय घालण्याचे आश्वासन।दिले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी  इतर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला योग्यते सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे. तर खाजगी विकासक,जागामालकांनी देखील योग्य सहकार्य केडीएमसी अधिकाऱ्यांना केले जाईल असे पाटील यांना सांगितले.

   कल्याण ग्रामीण मधील आजदे, सोनारपाडा,डोंबिवली एमआयडीसी, भोपर-देसलेपाडा, उसरघर, कोळे आणि कटाई या गावांमध्ये जागेची पाहणी करत  योजनेचा आढावा घेतला आहे.तर उर्वरीत गावांमध्ये पाहणी दौरा देखील लवकरच केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

 येत्या दोन वर्षात २७ गावांमध्ये ही योजना कार्यन्वित होणार असून कल्याण डोंबिवली मधील २७ गावांना या योजनेअंतर्गत १०५ एमएलडी पाणी मिळणार आहे.त्यामुळे २७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.असे केडीएमसीचे अधिकारी राजू पाठक आणि विजय पाटील यांनी सांगितले आहे. जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यन्वित होत नाही तो पर्यंत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करता येईल का ? याचा सुद्धा आढावा घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या आढावा दौऱ्यावेळी पाटील यांच्यासह केडीएमसीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  राजीव पाठक, विजय पाटील,मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, मनसे नगरसेवक प्रभाकर जाधव, केडीएमटी सद्यस प्रसाद माळी, मनसे उपविभाग अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका