शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

By सुरेश लोखंडे | Updated: April 16, 2023 14:46 IST

Fruits and Vegetables Are Exporte:

- सुरेश लोखंडे ठाणे : मुंबईची तहान भागवून स्वत: टंचाईला तोंड देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगभरातील २३ देशात आंबा, चिकू, सीताफळ या फळांसह भेंडी, कारली, मिरची, दुधी भोपळा हा भाजीपाला आणि फूल व फळझाडे निर्यात केली आहेत. गेल्या वर्षभरात तीन कोटी रुपये किमतीची ४७३ मेट्रिक टन फळे, भाजीपाला आणि फळफुलांच्या रोपांची निर्यात केली. शहरी जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचा कृषी माल आता परदेशात भाव खात आहे.

आतापर्यंत पावसाळी भाताच्या उत्पादनावर आणि मच्छीमारीच्या व्यवसायात समाधान मानणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल  परदेशात उत्तम भाव ‘खात’ आहे. खरिपाच्या भात या एका पिकावर शेतकरी अवलंबून होता. मात्र कृषी विभागाचा सततचा पाठपुरावा, शेतकऱ्यांमधील जनजागृती याची किमया साधून शेतकरी वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल करीत आहेत. कृषी माल निर्यात या धोरणाखाली जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि पणन विभागाने सागरी, नागरी, डोंगरी आदी दुर्गम भागातील शेती मालाला परदेशात बाजारपेठ उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या समूह शेतीच्या माध्यमातून कृषी उत्पादनावर लक्ष केंद्रित करीत आहे. जिल्ह्यातील हा कृषी माल युनायटेड किंग्डम, यूएसए, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात, स्पेन, जर्मनी, जपान आदी देशांच्या बरोबरच थायलंड, ओमन, कतार, मॉरिशस, केनिया, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया आदी देशातील बाजारपेठेत विक्रीला जात आहे. त्यापोटी वर्षभरात तीन कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली. अन्नधान्यात मका, फळे, भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, घरातील शोभेच्या वनस्पती आदी ४७२.७३ मेट्रिक टन कृषी माल व रोपांची निर्यात तब्बल ४३७ प्रमाणपत्राद्वारे  करण्यात आली. या निर्यातीसाठी ४६३ प्रमाणपत्रे निश्चित केली होती. मात्र त्यापैकी २६ प्रमाणपत्राद्वारे होणारी निर्यात ऐनवेळी रद्द झाली. यामध्ये आयरलँडकडून नऊ ऑर्डर, तर युनायटेड किंग्डमने दहा, यूएसएने दोन ऑर्डर रद्द केल्या.

परदेशात  पुरवठा झालेल्यांमध्ये  आंबा, चिकू, डाळिंब, सीताफळ, फणस, काकडी याचा समावेश आहे.   याखेरीज रेगिस्तानी गुलाब, घरातील व टेरेसच्या सजावटीचे, हवा शुद्धीकरणाची रोपटी, भाजीपाल्यामध्ये वांगी, कारली, भेंडी, दुधीभोपळा, आलं, लसूण आणि अन्नधान्यात मका आदी ३२ लाख ६३ हजार ४९९ नगांचा पुरवठा गेल्या वर्षभरात विमान, जहाजांद्वारे सातासमुद्रापार नेले आहे.

टॅग्स :Mangoआंबा