शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन आंब्याचा, तर ब्रिटिश चिकूचा झाला दिवाना, ठाणे जिल्ह्यातील फळे, भाजीपाला २३ देशांत निर्यात

By सुरेश लोखंडे | Updated: April 16, 2023 14:46 IST

Fruits and Vegetables Are Exporte:

- सुरेश लोखंडे ठाणे : मुंबईची तहान भागवून स्वत: टंचाईला तोंड देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगभरातील २३ देशात आंबा, चिकू, सीताफळ या फळांसह भेंडी, कारली, मिरची, दुधी भोपळा हा भाजीपाला आणि फूल व फळझाडे निर्यात केली आहेत. गेल्या वर्षभरात तीन कोटी रुपये किमतीची ४७३ मेट्रिक टन फळे, भाजीपाला आणि फळफुलांच्या रोपांची निर्यात केली. शहरी जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचा कृषी माल आता परदेशात भाव खात आहे.

आतापर्यंत पावसाळी भाताच्या उत्पादनावर आणि मच्छीमारीच्या व्यवसायात समाधान मानणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल  परदेशात उत्तम भाव ‘खात’ आहे. खरिपाच्या भात या एका पिकावर शेतकरी अवलंबून होता. मात्र कृषी विभागाचा सततचा पाठपुरावा, शेतकऱ्यांमधील जनजागृती याची किमया साधून शेतकरी वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल करीत आहेत. कृषी माल निर्यात या धोरणाखाली जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि पणन विभागाने सागरी, नागरी, डोंगरी आदी दुर्गम भागातील शेती मालाला परदेशात बाजारपेठ उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या समूह शेतीच्या माध्यमातून कृषी उत्पादनावर लक्ष केंद्रित करीत आहे. जिल्ह्यातील हा कृषी माल युनायटेड किंग्डम, यूएसए, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात, स्पेन, जर्मनी, जपान आदी देशांच्या बरोबरच थायलंड, ओमन, कतार, मॉरिशस, केनिया, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया आदी देशातील बाजारपेठेत विक्रीला जात आहे. त्यापोटी वर्षभरात तीन कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली. अन्नधान्यात मका, फळे, भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, घरातील शोभेच्या वनस्पती आदी ४७२.७३ मेट्रिक टन कृषी माल व रोपांची निर्यात तब्बल ४३७ प्रमाणपत्राद्वारे  करण्यात आली. या निर्यातीसाठी ४६३ प्रमाणपत्रे निश्चित केली होती. मात्र त्यापैकी २६ प्रमाणपत्राद्वारे होणारी निर्यात ऐनवेळी रद्द झाली. यामध्ये आयरलँडकडून नऊ ऑर्डर, तर युनायटेड किंग्डमने दहा, यूएसएने दोन ऑर्डर रद्द केल्या.

परदेशात  पुरवठा झालेल्यांमध्ये  आंबा, चिकू, डाळिंब, सीताफळ, फणस, काकडी याचा समावेश आहे.   याखेरीज रेगिस्तानी गुलाब, घरातील व टेरेसच्या सजावटीचे, हवा शुद्धीकरणाची रोपटी, भाजीपाल्यामध्ये वांगी, कारली, भेंडी, दुधीभोपळा, आलं, लसूण आणि अन्नधान्यात मका आदी ३२ लाख ६३ हजार ४९९ नगांचा पुरवठा गेल्या वर्षभरात विमान, जहाजांद्वारे सातासमुद्रापार नेले आहे.

टॅग्स :Mangoआंबा