शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाहतूककोंडीने अंबरनाथकर झाले पुरते हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:01 AM

वाहतूक विभागाचे दुर्लक्ष; शाळेच्या पहिल्याच दिवशी उशिरा जाण्याची आली वेळ

अंबरनाथ: १७ जून पासून सर्वच शाळा सुरू झाला. शाळा भरण्याच्या दिवशी शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पश्चिम भागात सात ते आठ मोठ्या शाळा आहेत त्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सर्वाधिक वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे शाळेच्या बस वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. ही सर्व वाहतूककोंडी केवळ पोलीस स्टेशन चौकात होत असल्याने यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी होत आहे.अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडी सर्वांनाच त्रासदायक ठरते आहे. ही सर्व कोंडी एकाच रस्त्यावर होत असल्याने येथे वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे दिसते. दुपारी १२ ते २ च्या दरम्यान ही कोंडी सर्वाधिक असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही तेथील कोंडी मात्र अजूनही फुटलेली नाही.कल्याण-बदलापूर रस्त्यावरील नगरपरिषद चौक, पोलीस स्टेशन चौक आणि विम्को नाका चौक सातत्याने कोंडीत सापडत आहे. शाळेची वेळ असो वा नसो, या ठिकाणी कोंडी मात्र कायम आहे. या कोंडीवर लक्ष केंद्रित करुन त्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र या रस्त्यावरील बेकायदेशीर वाहन पार्र्किं ग, दुकानदारांचे अतिक्रमण, पोलीस स्टेशन बाहेरील वाहने हे अडचणीचे मुद्दे ठरत आहेत. मात्र त्यावर कोणतेच उपाय आखले जात नाहीत. सोमवारी दुपारी १२ वाजता पुन्हा याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शाळा भरण्याची आणि सकाळच्या सत्रातील शाळा सुटण्याची वेळ असल्याने ही कोंडी सर्वाधिक झाली.अनेक शाळांचा आज पहिला दिवस असल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उशीरा जाण्याची वेळ आली. या कोंडीत अडकलेल्या शाळेच्या बस बाहेर काढण्याकडेही योग्य लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शाळेला बसतो आहे. दुसरीकडे या रस्त्यावर कोंडी वाढत असल्याने आता पर्यायी रस्त्यांचा शोध घेत वाहन चालक मार्ग बदलण्याचे काम करताना दिसतात.

टॅग्स :ambernathअंबरनाथTrafficवाहतूक कोंडी