शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:17 AM

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे. पार्किंगच्या प्लॉटवर त्रयस्थ व्यक्तीने दावा केल्याने तो प्लॉट संबंधित व्यक्तीकडे वर्ग केला आहे. हे करत असताना पालिकेच्या वकिलाने या प्लॉटची पालिकेला गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने तो प्लॉट हातातून गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नगररचना विभागाने प्लान मंजूर करण्याची कोणतीही घाई करू नये, अशी ओरड सभागृहात करण्यात आली.अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरच पार्किंगचा प्लॉट होता. त्यावर अतिक्रमण असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी कारवाई करत हा प्लॉट मोकळा केला होता. मात्र, हा प्लॉट मोकळा करण्यामागे वेगळेच कारण होते, हे समोर आले आहे. एकीकडे प्लॉट मोकळा झालेला असताना त्याचा ताबा हा त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आला होता. त्याला तो प्लॉट मोकळा करणे शक्य नसल्याने पालिकेला हाताशी धरून तोरमोकळा करण्यात आला. प्लॉट मोकळा होताच त्या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने दावा करत हा प्लॉट मिळवला. अर्थात, त्यासंदर्भातील सर्व कायदपत्रे नियमानुसारही तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना काही अटी व शर्तींवर तो प्लॉट दिलाही.वरवर हे प्रकरण साधे वाटत असले, तरी त्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी आणि पालिकेची बाजू मांडणारे वकीलही सहभागी असल्याचे शुक्रवारी सभागृहात उघड झाले. हा प्लॉट देताना पालिकेच्या वकिलांनी थेट या प्लॉटची पालिकेला गरज नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. वकिलाचे म्हणजे पालिकेचे म्हणणे असल्याने न्यायालयानेही संबंधित व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल लागल्यानंतर यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्याची कल्पना पालिकेला देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित वकिलांनी निकाल लागल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्याची माहिती पालिकेला दिली.ज्या वकिलांची नेमणूक पालिकेची बाजू मांडण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पालिकेच्या विरोधातच काम केल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्लॉटवरील आलेला प्रस्ताव थांबवण्याची मागणी करण्यात आली. नगररचना विभागाने या जागेवरील आलेल्या प्रस्तावाबाबत निर्णय घेताना सभागृहाची परवानगी घ्यावी, अशी मागणी यावेळी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केली.रुग्णवाहिका नसल्याने नगरसेवकाचा संतापअंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयाचे हस्तांतरण सरकारकडे करताना पालिकेच्या रुग्णवाहिका आणि शववाहिनी सरकारकडे वर्ग करण्यात आल्या. त्यामुळे आता पालिकेच्या ताब्यात एकही रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना मुंबईला नेताना त्रास सहन करावा लागत आहे.पालिकेने ही सेवा पुरवण्याची गरज असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक उमर इंजिनीअर यांनी केला. आपली मागणी मान्य होत नाही, तोवर सभागृहातील खुर्चीवर न बसता जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला.अखेर, यासंदर्भात इतर नगरसेवकांनीही इंजिनीअर यांची साथ दिल्यावर निविदा मागवत नवीन रुग्णवाहिका आणि शववाहिनी मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही निविदा प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.रस्त्याच्या विषयावर काँग्रेसचा सभात्यागअंबरनाथ येथील विम्कोनाका ते गावदेवी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झालेले असतानाही या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा विषय घेण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही असा ठराव केला जात असल्याने काँग्रेसचे नगरसेवक विलास जोशी यांनी या विषयाला विरोध करत सभात्याग केला.तोडलेले स्वच्छतागृह धुतल्याचे बिलअंबरनाथ नगरपालिकेच्या चिंचपाडा भागात एक स्वच्छतागृह तोेडण्यात आलेले असतानाही तेच स्वच्छतागृह नियमित धुण्यात येत असल्याचे दाखवत पालिकेने संबंधित कंत्राटदाराला बिल दिल्याचा आरोप नगरसेविका वृषाली पाटील यांनी केला आहे. तसेच स्वच्छतागृह धुण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा विषय असताना काम मागण्यासाठी गेलेल्या महिला बचत गटांकडून ३० हजारांची लाच मागण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे