शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:17 IST

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे. पार्किंगच्या प्लॉटवर त्रयस्थ व्यक्तीने दावा केल्याने तो प्लॉट संबंधित व्यक्तीकडे वर्ग केला आहे. हे करत असताना पालिकेच्या वकिलाने या प्लॉटची पालिकेला गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने तो प्लॉट हातातून गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नगररचना विभागाने प्लान मंजूर करण्याची कोणतीही घाई करू नये, अशी ओरड सभागृहात करण्यात आली.अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरच पार्किंगचा प्लॉट होता. त्यावर अतिक्रमण असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी कारवाई करत हा प्लॉट मोकळा केला होता. मात्र, हा प्लॉट मोकळा करण्यामागे वेगळेच कारण होते, हे समोर आले आहे. एकीकडे प्लॉट मोकळा झालेला असताना त्याचा ताबा हा त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आला होता. त्याला तो प्लॉट मोकळा करणे शक्य नसल्याने पालिकेला हाताशी धरून तोरमोकळा करण्यात आला. प्लॉट मोकळा होताच त्या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने दावा करत हा प्लॉट मिळवला. अर्थात, त्यासंदर्भातील सर्व कायदपत्रे नियमानुसारही तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना काही अटी व शर्तींवर तो प्लॉट दिलाही.वरवर हे प्रकरण साधे वाटत असले, तरी त्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी आणि पालिकेची बाजू मांडणारे वकीलही सहभागी असल्याचे शुक्रवारी सभागृहात उघड झाले. हा प्लॉट देताना पालिकेच्या वकिलांनी थेट या प्लॉटची पालिकेला गरज नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. वकिलाचे म्हणजे पालिकेचे म्हणणे असल्याने न्यायालयानेही संबंधित व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल लागल्यानंतर यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्याची कल्पना पालिकेला देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित वकिलांनी निकाल लागल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्याची माहिती पालिकेला दिली.ज्या वकिलांची नेमणूक पालिकेची बाजू मांडण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पालिकेच्या विरोधातच काम केल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्लॉटवरील आलेला प्रस्ताव थांबवण्याची मागणी करण्यात आली. नगररचना विभागाने या जागेवरील आलेल्या प्रस्तावाबाबत निर्णय घेताना सभागृहाची परवानगी घ्यावी, अशी मागणी यावेळी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केली.रुग्णवाहिका नसल्याने नगरसेवकाचा संतापअंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयाचे हस्तांतरण सरकारकडे करताना पालिकेच्या रुग्णवाहिका आणि शववाहिनी सरकारकडे वर्ग करण्यात आल्या. त्यामुळे आता पालिकेच्या ताब्यात एकही रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना मुंबईला नेताना त्रास सहन करावा लागत आहे.पालिकेने ही सेवा पुरवण्याची गरज असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक उमर इंजिनीअर यांनी केला. आपली मागणी मान्य होत नाही, तोवर सभागृहातील खुर्चीवर न बसता जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला.अखेर, यासंदर्भात इतर नगरसेवकांनीही इंजिनीअर यांची साथ दिल्यावर निविदा मागवत नवीन रुग्णवाहिका आणि शववाहिनी मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही निविदा प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.रस्त्याच्या विषयावर काँग्रेसचा सभात्यागअंबरनाथ येथील विम्कोनाका ते गावदेवी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झालेले असतानाही या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा विषय घेण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही असा ठराव केला जात असल्याने काँग्रेसचे नगरसेवक विलास जोशी यांनी या विषयाला विरोध करत सभात्याग केला.तोडलेले स्वच्छतागृह धुतल्याचे बिलअंबरनाथ नगरपालिकेच्या चिंचपाडा भागात एक स्वच्छतागृह तोेडण्यात आलेले असतानाही तेच स्वच्छतागृह नियमित धुण्यात येत असल्याचे दाखवत पालिकेने संबंधित कंत्राटदाराला बिल दिल्याचा आरोप नगरसेविका वृषाली पाटील यांनी केला आहे. तसेच स्वच्छतागृह धुण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा विषय असताना काम मागण्यासाठी गेलेल्या महिला बचत गटांकडून ३० हजारांची लाच मागण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे