शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:27 IST

नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे.

बदलापूर - नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. जिल्ह्यात आठवड्यातून ३० तास पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०१८ च्या झालेल्या बैठकीत घेतला आहे.जानेवारीच्या दुसºया आठवड्यापासून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना धरणातून होणारा पाणीपुरवठा यापुढे एक दिवसाआड होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गांभीर्याने कधी बघणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईच्या झळा आता यापुढे अधिक प्रकर्षाने जाणवणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर ही पाणीकपात लागू होणार असल्याने यापुढील काळात नागरिकांना उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतसा पाणीकपातीचा आणखीनच सामना करावा लागणार आहे.मागील काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या अनेक भागांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने बदलापूर, अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईला नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  टंचाईग्रस्त अंबरनाथकरांनी रोखला महामार्गअंबरनाथ : नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी हंडा आणि कळशा घेऊन कल्याण-बदलापूर महामार्ग बुधवारी सकाळच्या वेळेस काही काळ रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. पाणीकपात आणि अनियमित येणारे पाणीही येत नसल्याने बुवापाडा परिसरातील नागरिकांना हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.बुवापाडा येथे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी संतप्त होऊन कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरला. यामुळे काही काळ कोंडी झाली होती. जोपर्यंत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी येऊन पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतल्याने अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणीखात्याचे अधिकारी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.लघुपाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येत असल्याने त्यापुढे पाण्याची पातळी वाढण्यास काही कालावधी लागतो. मात्र, बुवापाडा भागात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी लक्ष देणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.डी. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर