शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:27 IST

नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे.

बदलापूर - नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. जिल्ह्यात आठवड्यातून ३० तास पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०१८ च्या झालेल्या बैठकीत घेतला आहे.जानेवारीच्या दुसºया आठवड्यापासून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना धरणातून होणारा पाणीपुरवठा यापुढे एक दिवसाआड होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गांभीर्याने कधी बघणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईच्या झळा आता यापुढे अधिक प्रकर्षाने जाणवणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर ही पाणीकपात लागू होणार असल्याने यापुढील काळात नागरिकांना उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतसा पाणीकपातीचा आणखीनच सामना करावा लागणार आहे.मागील काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या अनेक भागांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने बदलापूर, अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईला नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  टंचाईग्रस्त अंबरनाथकरांनी रोखला महामार्गअंबरनाथ : नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी हंडा आणि कळशा घेऊन कल्याण-बदलापूर महामार्ग बुधवारी सकाळच्या वेळेस काही काळ रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. पाणीकपात आणि अनियमित येणारे पाणीही येत नसल्याने बुवापाडा परिसरातील नागरिकांना हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.बुवापाडा येथे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी संतप्त होऊन कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरला. यामुळे काही काळ कोंडी झाली होती. जोपर्यंत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी येऊन पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतल्याने अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणीखात्याचे अधिकारी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.लघुपाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येत असल्याने त्यापुढे पाण्याची पातळी वाढण्यास काही कालावधी लागतो. मात्र, बुवापाडा भागात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी लक्ष देणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.डी. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर