शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अंबरनाथ - बदलापुरात 19 मे पासून प्रशासकीय राजवट; पाच वर्षाचा कार्यकाल संपल्याने शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 20:03 IST

अंबरनाथ नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींची मुदत ही 19 मे रोजी संपत आहे. मात्र कोरोनाशी लढत असतांना लोकप्रतिनिधींची मुदत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही नगरपरिषदांचा कार्यकाल हा 19 मे रोजी संपत असल्याने या दोन्ही नगरपरिषदा बरखास्त करुन त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. 19 मे राजी ही मुदत संपत असुन त्यानंतर शासनामार्फत उप विभागीय अधिका-यांकडे पालिकेची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मात्र मुदत संपल्यावरही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मदत घेऊन शहरात कोरोनाशी लढण्याचे काम करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींची मुदत ही 19 मे रोजी संपत आहे. मात्र कोरोनाशी लढत असतांना लोकप्रतिनिधींची मुदत वाढण्याचीशक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र नगरपालिका अधिनियमात लोकप्रतिनिधीची मुदत ही जास्तीत जास्त पाच वर्षच नमुद केल्याने राज्य शासनाने मुदत वाढीवर कोणाही विचार न करता थेट मुदत संपताच प्रशासकीय राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना लोकप्रतिनिधींचे अधिकार खंडीत न करण्याची गरज व्यक्त होत होती. मात्र ही गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने दखील प्रशासकीय राजवट लागू करित असतांना शहरातील विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवक यांना विश्वासात घेऊन कोरोनासोबत लढण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींची मुदत संपत असली तरी त्यांच्या मदतीने कोरोनासोबतचा लढा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांची मुदत ही 19 मे राजी संपत असुन 19 मे रोजी उपविभागीय अधिकारी सर्व कामकाज पाहणार आहे. प्रशासकीय राजवट लागू करुन सर्व कारभार हा प्रशासनामार्फत चालविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी ही जबाबदारी पार पाडणार असुन त्यांच्या देखरेखीखाली पालिकेचा कारभार पार पडनार आहे. नगराध्यक्षाचे जे अधिकार आहेत ते अधिकार पार पडण्याची जबाबदारी ही उप विभागीय अधिका-यांवर राहणार आहे. त्यांच्या मदतीला मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी राहणार आहे. प्रशासक नेमल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवक यांचे  पद हे नाममात्र राहणार आहे. त्यांना प्रशासकीय कामात कोणताही अधिकार राहणार नाही.

टॅग्स :badlapurबदलापूर