शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद

By अजित मांडके | Updated: March 4, 2024 17:22 IST

महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अजित मांडके, ठाणे : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले आहे. लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आव्हाड हे आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे. 

तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर