शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद

By अजित मांडके | Updated: March 4, 2024 17:22 IST

महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अजित मांडके, ठाणे : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले आहे. लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आव्हाड हे आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे. 

तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर