शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद

By अजित मांडके | Updated: March 4, 2024 17:22 IST

महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अजित मांडके, ठाणे : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले आहे. लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आव्हाड हे आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे. 

तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर