शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

'लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत...' आव्हाडांची आंबेडकरांना भावनिक साद

By अजित मांडके | Updated: March 4, 2024 17:22 IST

महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अजित मांडके, ठाणे : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे त्यांना भावनिक आवाहन केले आहे. लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितचे आजही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आव्हाड हे आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे. 

तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर