शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माओवाद्यांना पर्यायी शब्द जातीयवादी, खंडणीखोर - कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे ठाम प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:19 IST

"शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर चाललेल्या मुलाखतीत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी संदर्भ, उदाहरण आणि घटना सांगून शहरी नक्षलवादाची सविस्तर माहिती दिली. 

ठळक मुद्देमाओवाद्यांना पर्यायी शब्द जातीयवादी, खंडणीखोर - कॅप्टन स्मिता गायकवाड"शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर मुलाखतसंदर्भ, उदाहरण आणि घटना सांगून शहरी नक्षलवादाची दिली सविस्तर माहिती

ठाणे : नक्षलवादाचे सध्याचे स्वरूप वैचारिक नसून तद्दन व्यावसायिक आहे.शोषित, पीडितांच्या लढ्याच्या मुखवटा घेऊन प्रत्यक्षात शोषणच सुरू आहे.सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला गंभीर धोका उत्त्पन्न केला आहे. जातीयवादी,  खंडणीखोर हे आजच्या माओवादाला पर्यायी शब्द आहेत; असे ठाम प्रतिपादन नक्षलवादाच्या आणि मानवधिकाराच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले. 

ठाण्यातील घंटाळी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिंदू जागृती  सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित कार्यक्रमात "शहरी नक्षलवाद: सविधानासमोरील आव्हान " या विषयावर कॅप्टन स्मिता गायकवाड यांची जाहीर मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन स्मिता गायकवाड बोलत होत्या. सदर मुलाखत पत्रकार मकरंद मुळे यांनी घेतली.तसेच, श्रोत्यांच्या प्रश्नांनाही उत्तर दिली. शहरी नक्षलवाद काल्पनिक नसून, ती वस्तुस्थिती आहे. आता शहरी नक्षलवाद उघडकीस येत असल्याने तो "काल्पनिक" ठरविण्याचा आटापिटा केला जात आहेत. डोंगराळ भागात, आदिवासी क्षेत्रात, दुर्गम परिसरात होणाऱ्या हिंसक कृत्यांना लागणाऱ्या सर्वप्रकारचा पाठिंबा शहरी भागातून होत आहे. असे पाठिंबा देणारे कायद्याच्या चौकटीत आपली कृत्य करत आहेत. स्वयंसेवी संस्थांसारखे समांतर उपक्रम चालवून हिंसेला उत्तेजन दिले जात आहे. मानवी जीवनातील विविध समस्यांची मांडणी करणे, त्याची चर्चा घडवून आणणे, कायदेशीर मार्गाने आंदोलन उभे करणे त्यातून एक अस्वस्थता तयार करणे आणि त्या समस्येवर कोणतेही उत्तर जाणीव पूर्वक न शोधणे ही शहरी नक्षलींची कार्यपद्धती आहे. व्यवस्थेविषयी असंतोष निर्माण करूम व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जाते. जातीय भेद शोधून त्याआधारे चळवळी सुरू केल्या जातात. बंड, क्रांती, वंचितांना न्याय अशी आकर्षक, प्रभावी मांडणी करून त्याच्या भोवती समर्थनाचे आवरण तयार केले जाते. सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक क्षेत्रात एक भोवताल निर्माण केले जाते. मानवतावादाचा कायदा सोईने वापरला जातो. विविध काल्पनिक संकल्पना मांडून त्याच योग्य, सत्य असल्याचे बिंबवले जाते. हा सगळा प्रकार शहरी नक्षलवादच आहे असे सांगून कॅप्टन स्मिता गायकवाड आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाल्या, हे सगळं आपल्या अवतीभोवती घडत असते मात्र आपल्याला त्याची कल्पना येत नाही. घटना, वक्तव्य काळजीपूर्वक बघितल्यास त्या एकमेकांशी जोडल्यास हे समजून येईल. माओवाद हा आदिवासींच्या  भल्यासाठी नसून आदिवासी हे केवळ माओवादासाठी वापरले जात आहेत. शहरी नक्षलवाद ही  संकल्पना नवीन नसून सत्तरच्या दशकात पहिली माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन सुरू झाली होती. माओवादी ,फुटीरतावादी  हे येथीलच सामान्य माणसांची दिशाभूल करून, त्यांना फसवी आश्वासन देऊन देश विरोधी लढाईसाठी उभे करत आहेत. लढणाऱ्यांना आपण नेमके काय करत आहोत, हेच कळत नसते. ते माओवाद्यांना आपले प्रेषित समुजन काम करत असतात.सुरक्षा यंत्रणेबरोबर होणारी चकमक, धरपकड यात ही मंडळी अडकतात. मग, शहरी नक्षलवादी त्याचेही भांडवल करतात. देशात आपल्याच नागरिकांवर अत्याचार होत आहे असाही आवाज उठवतात,  सुरक्षा यंत्रणेविषयी गैरसमज निर्माण करतात. येथील कायद्यांचा गैरवापर करून  सुरक्षा यंत्रणांवर दबाव आणला जातो. या प्रकाराला उत्तर देताना सामान्य माणसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नक्षलविरोधी लढाई ही केवळ सशस्त्र सेनादले लढू शकणार नाहीत, असे कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या. माओवादी "मास ऑर्गनायझेशन"च्या माध्यमातून ही लढाई लढत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी सामान्य माणसांनाच आपल्याला क्षमतेनुसार काम करावे लागेल. नक्षलवादाला अनेकदा अज्ञानातून सहानुभूती मिळते. माओवादाचे समर्थन करणे हे पुरोगामीत्व समजले जाते. माओवादा विषयी असलेल्या भाबड्या समजूती घातक आहेत. नक्षलवाद हे आपल्या संविधानासमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यांची कार्यपद्धती, त्यांचे साहित्य, घोषणा, मांडणी याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ टिका, थट्टा आणि उपेक्षा करून चालणार नाही. मानवाधिकार हे सगळयांसाठी आहेत. त्याचा वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे.वेळीच सावध झाले पाहिजे अन्यथा हा धोका पुढिल पिढीसाठी त्रासदायक ठरेल, असे कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी मुलाखतीच्या शेवटी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र