शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आधीच कोरोनाची भीती, त्यात बेघर होण्याचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 00:54 IST

एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

डोंबिवली - ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील लगतचे रस्ते रुंद करण्याची कार्यवाही केडीएमसीकडून होणार आहे. त्या अंतर्गत रस्त्यालगतच्या वसाहतींमधील २० घरांवर हातोडा पडणार आहे. त्यासंदर्भात महापालिकेकडून संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.कोपर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. या ठिकाणी वाहतूक वाढल्याने येथील काही रस्त्यांवरील वाहतूक एकदिशा केली आहे, तर काही ठिकाणी सम-विषम (पी १, पी २) पार्किंगची अंमलबजावणीही सुरू आहे.सात महिन्यांपूर्वी केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी या परिसराची पाहणी केली होती. या वेळी येथील वाहतूक व्यवस्था व नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीदौºयात बेकायदा पार्किंग बंद करून रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार अधिकाºयांनी ठाकुर्ली उड्डाणपुलालगतचे पूर्वेकडील संभाजी पथ आणि छेडा क्रॉस रोड रुंदीकरणाची कार्यवाही सुरू केली होती. या रुंदीकरणासाठी घरे व अन्य बांधकामांवर मार्किंग करण्यात आले. हे दोन्ही रस्ते मंजूर विकास आराखड्यानुसार नऊ मीटरचे आहेत. हे पाहता यात इमारतींच्या संरक्षक भिंतींसह दोन्ही रस्त्यांच्या मध्यावर असलेल्या वसाहतीमधील २० घरांवरही रुंदीकरणामुळे हातोडा पडणार आहे. मात्र, या रुंदीकरणाला त्या वेळी स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला होता. जर घराच्या बांधकामाला हात लावला तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू, असा आक्र मक पवित्रा घेतला होता; परंतु बोडके यांच्या दौºयानंतर रुंदीकरणाची कार्यवाही केवळ नोटीस बजावण्यापुरतीच राहिली.मात्र, आता पुन्हा ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील रस्ते रुंदीकरणाचे प्रयत्न केडीएमसी प्रशासनाने सुरू केले आहेत. रुंदीकरणाला रहिवाशांचा विरोध आजही कायम आहे.वाहतूककोंडीच्या प्रश्नाला प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाचे नियोजनच चुकीचे झाले आहे. पुलाची एक बाजू जोशी हायस्कूलजवळ उतरविण्यात आली आहे. ती जागाच चुकीची आहे. याआधी कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर पूल उतरविला जाणार होता; पण तेथील घरे वाचविण्यासाठी जोशी हायस्कूल परिसराचा घाट घालण्यात आला.दरम्यान, आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर पूल उतरविण्याआधी वाहतूककोंडी होणार, याची जाणीव प्रशासनाला झाली नव्हती का? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आम्ही ६० ते ७० वर्षांपासून येथे राहत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.केडीएमसीचे ‘फ’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, आयुक्तांच्या आदेशानुसार मंजूर विकास आराखड्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याआधारे रस्ता रुंदीकरणात येणाºया घरांना नोटिसा पाठवल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली